शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

खासदारांनी दत्तक घेऊन गाव पोरकं सोडलं!

By admin | Updated: October 5, 2015 01:11 IST

सांसद आदर्श गाव योजनेत राज्यात सर्वाधिक ८ गावे पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र, ही योजना सुरू होऊन वर्ष उलटले तरी ठोस कामे होत नसल्याने ‘दत्तक घेतलं,

बापू बैैलकर, पुणेसांसद आदर्श गाव योजनेत राज्यात सर्वाधिक ८ गावे पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र, ही योजना सुरू होऊन वर्ष उलटले तरी ठोस कामे होत नसल्याने ‘दत्तक घेतलं, पोरकं सोडलं’ अशी या गावातील ग्रामस्थांनी भावना झाली आहे. आराखडे तयार झाले असून कामे अद्याप निविदा प्रक्रियेतच अडकली आहेत. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्यातील करंदी, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांनी हवेलीतील वडगाव शिंद, माजिद मेमन यांनी जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी , सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील दापोडी, वंदना चव्हाण यांनी मावळ तालुक्यातील सदुंब्रे, डी. पी. त्रिपाटी यांनी बारामतीतील मुर्टी ,संजय काकडे यांनी शिरूरमधील जांबूत आणि अशोक गांगुली यांनी पुरंदरमधील गुळूंचे गाव दत्तक घेतले आहे. ११ आॅक्टोबर २०१४ रोजी ही योजना कार्यान्वीत झाली असून ही गावे आॅक्टोबर २०१६ पर्यंत आदर्श करावयाची आहेत. मात्र, एक वर्षात केवळ ग्रामविकास आराखडे, बेसलाईन सर्व्हे झाले असून आता कुठे निविदा प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. कामे आलीच नाहीत व झालीही नाहीत, अशा भावना यातील काही गावांच्या ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दोन वर्षे आराखड्यात गेले. आता कुठे कामांना सुरूवात होत आहे. दापोडीचे सरपंच राजेंद्र नरोटे यांनी सांगितले की, कामांना आता वेग आला आहे. अंगणवाड्या, वाचनालय, प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. उद्या पोस्ट आॅफिसचे उद्घाटन होणार आहे. या योजनेचा नुकत्याच झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांसाठी ८ प्रकारचे आराखडे केले आहेत. यात राज्य व केंद्र सरकारच्या एकत्रित योजनांचा लाभ देण्यात येणार असून यात फक्त भौतिक सुधारणा न करता गावचे वातावरणच बदलण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार आमदार बाबुराव पाचर्णे यांनीही या गावांचे बजेट २९ कोटींपर्र्यत असून प्रत्यक्ष २ कोटी खर्च होतोय, मग विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. ---------आम्ही गावे परके सोडल्याच्या ग्रामस्थांच्या भावना आहेत. मात्र, आता दत्तक गावांमध्ये विकास योजना झपाट्याने होणार असून ग्रामस्थांना गावातच रोजगार उपलब्ध करुन ती स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार आढळराव पाटील यांनी नुकत्याच झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत सांगितले आहे. वडगाव शिंदेचे सरपंच भरत काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, कामे आलीच नाहीत. आता मंजूर झाली आहेत. कधी कामे होणार, असा प्रश्न उपस्थित केला. आम्ही आमच्या परीने पाठपुरावा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुर्टी गावचे माजी उपसरपंच तानाजी खोमणे यांनी सांगितले, अद्याप एकही काम सुरू झाले नाही. खासदारसाहेब या योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते. ते पुन्हा फिरकले नाहीत. ग्रामपंचायतीला एवढा निधी मिळणार आहे, अशी पत्र फक्त येत आहेत. बरेच प्रस्ताव दिले आहेत. मात्र कोणत्याच कामासाठी पैैसे आले नाहीत.