शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

तीन मुलींचा खून करून मातेची आत्महत्या

By admin | Updated: May 27, 2016 00:28 IST

मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून होत असलेला छळ असह्य झाल्याने विवाहितेने तीन मुलींचा खून करून स्वत:ही आत्महत्या केली. मन सुन्न करणारी ही घटना

औरंगाबाद : मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून होत असलेला छळ असह्य झाल्याने विवाहितेने तीन मुलींचा खून करून स्वत:ही आत्महत्या केली. मन सुन्न करणारी ही घटना रेल्वेस्टेशन परिसरातील राहुलनगर येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.राधा संतोष त्रिभुवन (२४) हिने पोटच्या तीन मुली राजनंदिनी (७), कोमल (४) आणि प्रांजल (२) यांचा खून करून स्वत:चेही जीवन संपविले. राधा आणि संतोष यांचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला. राधाच्या माहेरच्या लोकांनी जावयाला एक लाख रुपये दिले होते. त्यानंतरही त्यांच्याकडून पैशांची मागणी होत होती. पहिल्या दोन मुलींना जन्म दिल्यानंतर तिचा त्रास वाढला होता. संतोष तिला बेदम मारहाण करायचा. त्यामुळे तिने तीन वर्षांपूर्वी महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल केली होती. तेव्हा तिच्या नंदई आणि अन्य नातेवाईकांनी यापुढे कोणताही त्रास होणार नाही, अशी हमी दिल्याने ती नांदावयास गेली होती. त्यानंतर तिने तिसऱ्या मुलीस जन्म दिला आणि तिच्या त्रासात अधिक भर पडल्याचे राधाच्या आईने सांगितले. गुरुवारी पहाटे राधाने गळफास घेतला. कुटुंबियांंनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. दुसरीकडे राजनंदिनी, कोमल आणि प्रांजल या तिघी झोपेतून उठल्याच नाहीत. तपासणीत त्यांचाही मृत्यू झाल्याचे आढळले. (प्रतिनिधी)