शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

सर्वाधिक तीन हॉट शहरे महाराष्ट्रातील

By admin | Updated: April 8, 2017 05:33 IST

उष्णतेची लाट पुन्हा तीव्र झाल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे.

पुणे : उष्णतेची लाट पुन्हा तीव्र झाल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे. विदर्भात तर सूर्य आग ओकू लागला असून, शुक्रवारी चंद्रपूरात ४४.२ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. देशातील सर्वाधिक तापलेल्या १० शहरांपैकी पहिली तीन शहरे महाराष्ट्रातील असल्याची नोंद स्कायमेटने नोंदविली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट आहे. गेल्या चार दिवसांत त्याची तीव्रता थोडी कमी झाल्याने दिलासा मिळाला होता, परंतु शुक्रवारी पुन्हा पारा चांगलाच वाढला. त्यातही सर्वाधिक झळ विदर्भाला बसली. तेथील बहुतांश ठिकाणचे तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान होते. होरपळून टाकणाऱ्या या ऊन्हामुळे उपराजधानी नागपूरसह विदर्भवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यातही जिवाची काहिली होत आहे. परभणी, नांदेड, बीड यांसह मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, सोलापूर, खान्देशात जळगाव, मालेगाव या शहरांचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे होते. (प्रतिनिधी)>राज्यांतील शहरांतील कमाल तापमान(अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई ३३.५, रत्नागिरी ३२.१, पुणे ३७.७, अहमदनगर ४१.५, जळगाव ४०, कोल्हापूर ३८.४, महाबळेश्वर ३३.१, मालेगांव ४२, सांगली ३९.७, सातारा ३८.४, सोलापूर ४०.७, औरंगाबाद ३९.२, परभणी ४१.१, नांदेड ४१.५, अकोला ४२.६, अमरावती ४०.६, बुलडाणा ३९, ब्रह्मपुरी ४३.३, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४१.५, नागपूर ४३.३, वाशिम ३८.८, वर्धा ४३, यवतमाळ ४०.५.गोवा, कोकण, येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागातही ऊन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे.