शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

सर्वाधिक तीन हॉट शहरे महाराष्ट्रातील

By admin | Updated: April 8, 2017 05:33 IST

उष्णतेची लाट पुन्हा तीव्र झाल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे.

पुणे : उष्णतेची लाट पुन्हा तीव्र झाल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे. विदर्भात तर सूर्य आग ओकू लागला असून, शुक्रवारी चंद्रपूरात ४४.२ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. देशातील सर्वाधिक तापलेल्या १० शहरांपैकी पहिली तीन शहरे महाराष्ट्रातील असल्याची नोंद स्कायमेटने नोंदविली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट आहे. गेल्या चार दिवसांत त्याची तीव्रता थोडी कमी झाल्याने दिलासा मिळाला होता, परंतु शुक्रवारी पुन्हा पारा चांगलाच वाढला. त्यातही सर्वाधिक झळ विदर्भाला बसली. तेथील बहुतांश ठिकाणचे तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान होते. होरपळून टाकणाऱ्या या ऊन्हामुळे उपराजधानी नागपूरसह विदर्भवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यातही जिवाची काहिली होत आहे. परभणी, नांदेड, बीड यांसह मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, सोलापूर, खान्देशात जळगाव, मालेगाव या शहरांचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे होते. (प्रतिनिधी)>राज्यांतील शहरांतील कमाल तापमान(अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई ३३.५, रत्नागिरी ३२.१, पुणे ३७.७, अहमदनगर ४१.५, जळगाव ४०, कोल्हापूर ३८.४, महाबळेश्वर ३३.१, मालेगांव ४२, सांगली ३९.७, सातारा ३८.४, सोलापूर ४०.७, औरंगाबाद ३९.२, परभणी ४१.१, नांदेड ४१.५, अकोला ४२.६, अमरावती ४०.६, बुलडाणा ३९, ब्रह्मपुरी ४३.३, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४१.५, नागपूर ४३.३, वाशिम ३८.८, वर्धा ४३, यवतमाळ ४०.५.गोवा, कोकण, येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागातही ऊन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे.