शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश पोलिसांची योगासनाला नकारघंटा

By admin | Updated: January 12, 2017 04:34 IST

केंद्र सरकार योगासनाच्या प्रसारासाठी आग्रही असले, तरी राज्यातील सुमारे पावणेदोन लाखांवर पोलीस मात्र

जमीर काझी / मुंबईकेंद्र सरकार योगासनाच्या प्रसारासाठी आग्रही असले, तरी राज्यातील सुमारे पावणेदोन लाखांवर पोलीस मात्र, रोज सकाळी उठून ‘अनुलोम-विलोम’ करण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत. पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथुर यांनी त्याबाबत वारंवार सूचना देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योगला थंड प्रतिसाद दिला आहे. ६० पोलीस घटकांपैकी मुंबईसह केवळ ७ घटक सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात योग प्रशिक्षण शिबिर सुरू ठेवले आहे. केंद्राच्या आयुष योगा मंत्रालयांची ही महत्त्वाकांक्षी योग प्रशिक्षण योजना पोलीस दलात बारगळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलीस महासंचालकांनी सर्व घटकप्रमुखांना तातडीने कार्यवाही सुरू करण्याची सूचना केली आहे. १५ जानेवारीपर्यंत त्याबाबत ‘अल्टिमेटम’ देण्यात आला आहे. मानसिक स्वास्थ्य व निरोगी आयुष्य राहावे, यासाठी आयुष मंत्रालयाच्या योग प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलीस दलाकडून घेतला. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये, अधीक्षक, प्राचार्य, सर्व समादेशक, नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालकांना ही योजना राबविण्याची सूचना करण्यात आली. पोलीस अधिकारी-अंमलदारांना योगाचे महत्त्व व प्रशिक्षण देण्यासाठी लोणावळा येथील कैवल्यधाम या संस्थेची नियुक्ती करण्यात आली. या संस्थेकडून सर्व घटकांसाठी योग प्रशिक्षकांची निश्चिती करून त्यांंच्याशी संपर्कात राहून शिबिराच्या नियोजनाचे आदेश देण्यात आले होते. मुख्यालयाने सुुचविल्याप्रमाणे योग शिबिर सुरू केले आहेत. मात्र, उर्वरित ५३ घटकांकडून त्याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पावणेदोन लाखांहूनही अधिक पोलीस योगासने करण्यासाठी इच्छुक नसल्याचे समोर आले आहे. सर्व घटकांनी तातडीने प्रशिक्षण शिबिर, त्यासाठी बॅँक खाते सुरू करून, त्याबाबतची सविस्तर माहिती १५ जानेवारीपर्यंत मुख्यालयाला सादर करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत.ताणामुळे अनुत्सुकअनेकदा पोलिसांना पुरेशी झोपही मिळत नाही. त्यामुळे योगासनाला जाण्याची इच्छाही होत नसल्याने, प्रशिक्षण योजना राबविण्यात अडचणी येत आहेत. ते सुरू केले, तरी किती अंमलदार त्यामध्ये सहभागी होतील, याची खात्री नाही. त्यामुळे जादा कामाच्या विभाजनाच्या दृष्टीने आधी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.