शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

सर्वांत आकर्षक चेहरा

By admin | Updated: January 15, 2017 01:22 IST

आकर्षक चेहरा ही दैवी देणगी असते. आकर्षक चेहरा खेचून घेतो, मोहिनी घालतो, सारेकाही विसरायला लावतो आणि हो तो पहिल्यावर अन्य काही पाहण्याची इच्छाच उरत नाही.

- डॉ. नीरज देव चाकोरीबाहेरचा विचार करून त्यातून तात्त्विक बोधाची जाणीव करून देणारं हे सदर दर १५ दिवसांनी.आकर्षक चेहरा ही दैवी देणगी असते. आकर्षक चेहरा खेचून घेतो, मोहिनी घालतो, सारेकाही विसरायला लावतो आणि हो तो पहिल्यावर अन्य काही पाहण्याची इच्छाच उरत नाही. जगात सर्वांत आकर्षक चेहरा कोणाचा असावा यावर मात्र सगळ्यांची मते वेगवेगळी येतील. कोणी म्हणेल मधुबालाचा तर कोणी ऐश्वर्या, ऊर्मिला वा दीपिकाचा द मर्लिन मेन्रोचा. पण, हाच प्रश्न एखाद्या छोट्या बाळाला विचारला तर तो म्हणेल, माझ्या आईचा! कोणत्याही स्वरूपसुंदरीपेक्षा त्याची आई त्याला आधिक आकर्षक वाटेल मग ती कुरुप असली तरीही. अगदी भिकारणीच्या मुलालासुद्धा असेच वाटेल. पण जसजसे वय वाढते तसतशी आकर्षकतेची व्याख्या बदलते. खरे सांगायचे तर चेहऱ्याची आकर्षकता चेहऱ्यात नसते; ती असते पाहणाऱ्याच्या नजरेत. कधीकधी तर मला वाटते त्याहीपेक्षा ती असते गरजेत. गरजेशिवाय आकर्षण निर्माणच होत नाही. म्हणून तर लहान मुलाला त्याच्या आईचा, प्रियकर - प्रेयसीला परस्परांचा, बुभुक्षिताला दात्याचा आणि मरणाऱ्याला मृत्यूचा चेहरा हवाहवासा वाटतो.मृत्यूचा चेहरा? म्हणजे यमाचा की काय? कसा असेल हा यम? पुराणांनी तर वर्णन करून ठेवलेय, काळाकुट्ट, बलशाली व रेड्यावर बसून येणारा, कर्दनकाळ, रौद्र-भीषण, कठोर चेहऱ्याच्या यमाचा मला प्रश्न पडतो, या अशा भयप्रद व अनाकर्षक यमासोबत लोक का जात असतील? कोणी म्हणेल, मरणे का आपल्या हातात असते? मरण आले की जावेच लागते. पण अनेक तत्त्ववेत्ते व मनोविश्लेषक सांगतात की, मरण्याची इच्छा झाल्याशिवाय मरण येतच नाही. फ्र ॉईड या इच्छेला नाव देतो ‘मृत्युएषणा’ - मरण्याची इच्छा. यावर कोणी म्हणेल अपघातात मरणाऱ्याला कसली आली मरणेच्छा? आपण नेहमीच बघतो; ऐकतो अपघातात गंभीर जखमी झालेले म्हणतात, ‘यापेक्षा मरण परवडले.’ मग कल्पना करा त्या तीव्र यातनेत मरणाऱ्यालाही हेच वाटले असणे संभवनीय आहे. अगदी एका पळासाठी. म्हणतात ना, पानाला लावलेला चुना वाळायला वेळ लागतो; पण त्याला यायला वेळ लागत नाही, मग पळभरासाठी डोकावलेला हा विचार त्याला यायला पुरेसा नाही का?मला आठवतात परांजपेकाका. डॉक्टरांनी त्यांची आतडी काढून टाकली होती. तोंडाने अन्नपाणी घेता येत नव्हते. चालता येत नव्हते, उठून बसता येत नव्हते. डॉक्टरांनी व घरच्यांनी आशा केव्हाच सोडलेली होती. तरीही त्यांची जगण्याची जिद्द दांडगी होती. तब्बल सहा महिने ते या अवस्थेत जगले ते त्यांच्या मुलीचे लग्न ठरलेले पाहण्यासाठी. बाजी प्रभू नाही का सांगत होता, ‘तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला.’ ही जिजीवीषाच सिद्ध करते की मृत्युएषणा असते. आपली तीव्र इच्छा पूर्ण झाली वा पूर्ण होतेय किंवा पूर्ण होण्यासाठी आपण संपूर्ण प्रयास केले. आता ती होईल वा पूर्ण होणे आजिबात शक्य नाही हे ध्यानात आले की जिजीवीषा सरून मृत्युएषणा येत असावी. ही मृत्युएषणा केव्हा निर्माण होईल? जेव्हा आपण मृत्यूला पाहू तेव्हाच ना? आणि त्याला पहिल्यावर; कुणीतरी जिवलग भेटल्यावर जसे आपण आपली सारी सुख-दु:खे, व्याप-ताप सारेकाही क्षणभर विसरून जातो अगदी तसेच सगळेकाही सोडून माणसे त्याच्या सोबत निघून जात असावीत. प्रत्यक्षात जगात काय दिसते; जीवनभराची साथ निभावयाची शपथ घेतलेले पण अर्ध्या वाटेवर हात सोडलेले प्रेमिक, लहानग्या बाळाला उघड्यावर टाकून जाणारी आई, आईला सोडून कोणाजवळ न जाणारे मात्र यमाच्या मिठीत सहजपणे शिरणारे बाळ, मुलीच्या लग्नाआधी मरणार नाही असे म्हणणारा पण ऐनवेळी निघून जाणारा पिता... जीवनाकडे पाहिले की अर्ध्यावर डाव सोडून जाणारे अनेक जण आढळतात व त्यांच्यामागे ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’ म्हणत तळमळणारे त्यांचे प्रियजनही डोळ्यांपुढे तरळतात. तुमच्याही पुढे असे अनेक चेहरे तरळत असतील. पण, सोडून जाणाऱ्याच्या नजरेपुढे केवळ यमाचाच चेहरा तरळत असावा, त्याला भुरळ पाडत असावा. आपले कर्तव्य, आपल्या दायित्वापेक्षाही जाणाऱ्याला मृत्यू जवळचा का वाटत असावा? वीतरागी साधूंना वा मृत्यूशी लढा देत जगतो म्हणणाऱ्या वीरालासुद्धा मृत्यूला भेटण्याची आस का निर्माण व्हावी? मला वाटते जाणाऱ्याला कोठेतरी या संसारापेक्षा मृत्यूचा चेहरा अधिक आकर्षक वाटत असावा. त्याचा चेहरा पहिल्यावर इतर कोणताच चेहरा पाहू नये असे वाटावे इतका तो आकर्षक असल्याने; त्याला पहिलेले आपल्याला कधीच भेटत नसावेत...?