शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींमुळे गुजरातवर दीड लाख कोटींहून अधिक कर्ज - शक्तीसिंह गोहिल

By admin | Updated: May 26, 2016 15:57 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या विकासाबाबत मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु २ वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात अच्छे दिन आलेच नाहीत.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. २६ -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या विकासाबाबत मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु २ वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात अच्छे दिन आलेच नाहीत. गुजरातचे मुख्यमंत्री असतानादेखील त्यांचा कार्यकाळ अपयशी ठरला असेच म्हणावे लागेल. त्यांच्या कार्यकाळात गुजरातवर दीड लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज झाले, असा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व गुजरात विधानसभेतील आमदार शक्तीसिंह गोहिल यांनी केला. नागपूरातील रविभवन येथे पत्रकारपरिषदे दरम्यान ते बोलत होते.
 
नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून हाती सूत्रे घेतली तेव्हा गुजरातवर काहीच कर्ज नव्हते. परंतु ज्यावेळी त्यांनी सत्ता सोडली तेव्हा तब्बल १ लाख ६५ हजार कोटी रुपयांचे राज्यावर कर्ज होते. मोदी यांच्या कार्यकाळातच गुजरात पेट्रोलिअम कॉर्पोरेशनमध्ये २० हजार कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे ‘कॅग’च्या अहवालातून स्पष्ट होत आहे, असा दावा गोहिल यांनी केला. 
 
गेल्या २ वर्षांत देशातील जनतेची केंद्र शासनाने दिशाभूलच केली आहे. केंद्र शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी, व्यापारी, तरुण, पेन्शनर इत्यादींमध्ये निराशेचे वातावरण आहे. ‘मेक इन इंडिया’देखील पूर्णपणे अपयशी ठरले असून या कालावधीत निर्यातीमध्ये ३४ टक्क्यांची घट झाली आहे. संपुआच्या शासनकाळात मनरेगाचे काम प्रभावी पद्धतीने सुरू होते. 
 
परंतु मोदी सरकार आल्यापासून २० लाख लोकांना कामच मिळालेले नाही. मोदी जगभरात फिरत असतात. हा स्वत:चे ‘मार्केटिंग’ करण्याचा प्रकार आहे. परंतु यामुळे देशाचे काय भले झाले, असा प्रश्न गोहिल यांनी उपस्थित केला. 
 
मोदी सरकारच्या दाव्यांमधील फोलपणा समोर आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. कॉग्रेसचे कार्यकर्ते सामान्य जनतेमध्ये जाऊन सत्य मांडणार आहेत. २८ मे रोजी पक्षातर्फे मोदी सरकारच्या कामगिरीतील फोलपणा दाखविणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 
 
‘अगस्ता वेस्टलॅन्ड’च्या माध्यमातून कॉंग्रेसला बदनाम करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असा आरोपदेखील गोहिल यांनी केला. पत्रपरिषदेला प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव डॉ.बबन तायवाडे, सचिव अतुल कोटेचा, सुभाष भोयर, संदीप सिंगलकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.