शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

राज्यात उष्माघाताचे ४५०० हून अधिक कॉल

By admin | Updated: May 26, 2016 02:08 IST

राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने उष्माघात होणाऱ्यांची संख्या राज्यात वाढली आहे. मागील तीन महिन्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसेसच्या ‘डायल १०८’ या सेवेकडे राज्यभरातून

पुणे : राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने उष्माघात होणाऱ्यांची संख्या राज्यात वाढली आहे. मागील तीन महिन्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसेसच्या ‘डायल १०८’ या सेवेकडे राज्यभरातून तब्बल चार हजार ५२१ कॉल उष्माघाताचा त्रास झाला म्हणून आले आहेत. तीव्र झळांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील जनजीवन होरपळून गेले आहे. साहजिकच तेथील नागरिकांना उष्माघाताचा जास्त त्रास झाला. उन्हामुळे डोकेदुखी, ताप, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात. यावर वेळीच उपचार न झाल्यास या समस्यांचे स्वरुप तीव्र होते. प्रसंगी व्यक्ती बेशुद्ध होऊन तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अशावेळी १०८ क्रमांक फिरवून अ‍ॅम्ब्युलन्स बोलविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.याबाबत माहिती देताना महाराष्ट्र इमर्जन्सी सर्व्हीसेसच्या डॉ. ज्योत्स्ना माने म्हणाल्या, साधारणत: दरवर्षीच उन्हाळ््याच्या दिवसात डायल १०८ ला अशाप्रकारचे कॉल येतात. मात्र यावर्षी ही संख्या जास्त असल्याचे दिसते. साधारणत: फेब्रुवारी आणि मार्च वैशाख वणव्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढतात. राज्यभरातून फेब्रुवारीमध्ये १४०४ कॉल उष्माघाताच्या रुग्णांचे आले. तर मार्च आणि एप्रिलमध्ये अनुक्रमे १६०७ व १५१० कॉल आले. सर्वाधिक कॉल अमरावतीतून आले असून त्यांची संख्या ७७१ इतकी आहे. त्याखालोखाल यवतमाळमधून २५७ कॉल आले. उष्माघाताने मरण पावलेल्यांची सर्वाधिक संख्या विदर्भातच आहे. यशिवाय मुंबईतून २४८ कॉल उष्माघातासाठी आले. शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी ‘डायल १०८’ ही तातडीच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)