शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उष्माघाताचे ४५०० हून अधिक कॉल

By admin | Updated: May 26, 2016 02:08 IST

राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने उष्माघात होणाऱ्यांची संख्या राज्यात वाढली आहे. मागील तीन महिन्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसेसच्या ‘डायल १०८’ या सेवेकडे राज्यभरातून

पुणे : राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेने उष्माघात होणाऱ्यांची संख्या राज्यात वाढली आहे. मागील तीन महिन्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसेसच्या ‘डायल १०८’ या सेवेकडे राज्यभरातून तब्बल चार हजार ५२१ कॉल उष्माघाताचा त्रास झाला म्हणून आले आहेत. तीव्र झळांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील जनजीवन होरपळून गेले आहे. साहजिकच तेथील नागरिकांना उष्माघाताचा जास्त त्रास झाला. उन्हामुळे डोकेदुखी, ताप, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात. यावर वेळीच उपचार न झाल्यास या समस्यांचे स्वरुप तीव्र होते. प्रसंगी व्यक्ती बेशुद्ध होऊन तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अशावेळी १०८ क्रमांक फिरवून अ‍ॅम्ब्युलन्स बोलविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.याबाबत माहिती देताना महाराष्ट्र इमर्जन्सी सर्व्हीसेसच्या डॉ. ज्योत्स्ना माने म्हणाल्या, साधारणत: दरवर्षीच उन्हाळ््याच्या दिवसात डायल १०८ ला अशाप्रकारचे कॉल येतात. मात्र यावर्षी ही संख्या जास्त असल्याचे दिसते. साधारणत: फेब्रुवारी आणि मार्च वैशाख वणव्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढतात. राज्यभरातून फेब्रुवारीमध्ये १४०४ कॉल उष्माघाताच्या रुग्णांचे आले. तर मार्च आणि एप्रिलमध्ये अनुक्रमे १६०७ व १५१० कॉल आले. सर्वाधिक कॉल अमरावतीतून आले असून त्यांची संख्या ७७१ इतकी आहे. त्याखालोखाल यवतमाळमधून २५७ कॉल आले. उष्माघाताने मरण पावलेल्यांची सर्वाधिक संख्या विदर्भातच आहे. यशिवाय मुंबईतून २४८ कॉल उष्माघातासाठी आले. शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी ‘डायल १०८’ ही तातडीच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)