शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

पानिपत युद्धात मराठ्यांचा नैतिक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 02:21 IST

पानिपतच्या रणसंग्रामात जरी मराठे युद्ध हरले, तरी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन दिल्ली राखली.

चिंचवड : पानिपतच्या रणसंग्रामात जरी मराठे युद्ध हरले, तरी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन दिल्ली राखली. अन्यथा आज दिल्ली पाकिस्तानात असती. म्हणून तो आपला नैतिक विजय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहाससंशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. सदाशिव बहिरवाडे क्रीडांगण, शाहूनगर, चिंचवड येथे सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठान आयोजित तीनदिवसीय राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ‘पानिपतचा रणसंग्राम - एक शौर्यगाथा’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना बलकवडे बोलत होते. या प्रसंगी सदर्न कमांडचे कर्नल विजय जगदाळे, नगरसेवक जितू पवार, पंकज ढाके, कमलिनी जगताप, गजानन चिंचवडे, बापूसाहेब तोंडकर, जालिंदर पोखरकर, अनिल पाटील, चंद्रकांत दीक्षित आदी उपस्थित होते. मुख्य संयोजक नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. बलकवडे म्हणाले की, छत्रपती शिवाजीमहाराजांना स्वराज्याचे रक्षण आम्ही प्राणांची बाजी लावून करू, असे अभिवचन मावळ्यांनी दिले होते. ते पानिपतच्या रणसंग्रामच्या निमित्ताने शंभर वर्षांनंतरदेखील अक्षरश: पाळले. वास्तविक पानिपतचा प्रदेश हा स्वराज्यापासून हजारो मैल दूर होता. प्रत्यक्षात तेथे मावळ्यांचे स्वराज्य नव्हते; परंतु अखंड हिंदुस्थानावर आपला भगवा फडकावा, असे शिवाजीमहाराजांचे स्वप्न होते. शिवरायांच्या पश्चात संभाजी, राजाराम, ताराबाई, शाहू अशा त्यांच्या वारसांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रसंगी शर्थीची झुंज देत मावळ्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. छत्रपती शाहूमहाराज यांनी आपल्या मुत्सद्दीपणाचा प्रत्यय देत मराठी तरुणांना मुगल साम्राज्याशी संघर्ष करण्याचा नवा ध्येयवाद दिला. यामध्ये बाजीराव या तरुणाने शाहूमहाराजांचे लक्ष वेधून घेतले. बाजीरावाने आपल्या पराक्रमाने हिंदुस्थानातील अनेक प्रांत काबीज करीत स्वराज्याचा परीघ वाढवला. इराणच्या नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण केल्याने मोगल बादशाहाने मराठ्यांकडे मदत मागितली. या निमित्ताने मराठी फौजांनी वेळोवेळी दिल्लीचे रक्षण केले आणि त्या बदल्यात अखंड हिंदुस्थानावर चौथाईचा आणि सरदेशमुखीचा हक्क प्रस्थापित केला. इ.स. १७०७मध्ये औरंगजेबाच्या निधनापश्चात ५० वर्षांत म्हणजेच इ.स. १७५७मध्ये अटक ते कटक अशा अखंड हिंदुस्थानावर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकू लागला होता. महंमदशहा अब्दाली या महत्त्वाकांक्षी अफगाणी सम्राटाने वेळोवेळी आक्रमणे करीत दिल्लीचे तख्त काबीज करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी शर्थीची झुंज देत मराठ्यांनी त्याची आक्रमणे निष्प्रभ करीत दिल्लीच्या मोगल तख्ताचे रक्षण केले. (वार्ताहर)>इ.स. १७६०मध्ये ५० हजार सैन्य घेऊन अब्दालीने आक्रमण केले आणि सदाशिवरावभाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याबरोबर पानिपतचा रणसंग्राम झाला. ज्या मोगलांच्या रक्षणासाठी मराठे लढले, त्यांचे कोणत्याही प्रकारचे साहाय्य नाही, अन्नधान्याची पुरेशी रसद नाही, अशा विपरीत परिस्थितीत आणि परकीय मुलखात हा रणसंग्राम झाला. कुटुंबकबिला आणि बाजारबुणगे कुरुक्षेत्रावर कर्मकांडात गुंतल्याने लढाईकडे दुर्लक्ष झाले.ऐनवेळी युद्धनीतीचा बोजवारा उडाल्याने पराभव झाला. मराठे आणि अब्दाली अशा दोन्ही बाजूंकडील सुमारे एक लाख माणसे मारली गेली. केवळ आठ तासांत एवढी प्रचंड मनुष्यहानी होण्याच्या हा दुर्दैवी जागतिक विक्रम आहे. या युद्धात जिंकल्यानंतरदेखील अब्दालीने दिल्लीचे तख्त मराठ्यांकडे सोपवले म्हणून हा नैतिक विजय आहे. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले.