शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून रेंगाळल्याने पक्ष्यांचा पाळणा लांबला!

By admin | Updated: July 1, 2014 02:15 IST

देशातील बहुतांश भागात मान्सूनने पाठ फिरविली. त्यामुळे केवळ शेती आणि शेतक:यांचे नुकसान झाले नाही, तर सारे निसर्गचक्रच बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

गजानन दिवाण - औरंगाबाद
देशातील बहुतांश भागात मान्सूनने पाठ फिरविली. त्यामुळे केवळ शेती आणि शेतक:यांचे नुकसान झाले नाही, तर सारे निसर्गचक्रच बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊसच नसल्याने देशातील स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे जीवनचक्र बदलले असून अनेकांचा ‘पाळणा’ लांबला आहे. 
पावसाळा म्हणजे निसर्गाचा भरभरून आनंद घेण्याचा काळ. याच काळात अनेक पक्षी सातासमुद्रापलीकडून भारतात येतात आणि येथेच घरटी बांधून आपला संसार फुलवितात. मात्र यंदा पाऊस लांबल्याने त्यांचे सारे जीवनचक्रच बदलले आहे. द. आफ्रिका तसेच हिमालयातून आपल्याकडे येणारा चातक कोठेच दिसत नाही. त्याचा एखादाही ‘कॉल’ ऐकायला मिळत नाही, अशी माहिती वॉटरशेड ऑर्गनायेङोशन ट्रस्टचे व्यवस्थापक आणि पुण्यातील पक्षीतज्ज्ञ डॉ. गिरीश जठार यांनी ‘लोकमत’ला दिली. गेल्या दोन दिवसांपासून ते नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यांत फिरत आहेत. या काळात नेहमी पावसाळ्यात प्रजननासाठी येणारा, घरटी बांधणारा एकही पक्षी त्यांना दिसला नाही किंवा त्यांची कुठली इतर हालचालही दिसली नाही. शिंपी, वटवटय़ा, ठिपकेवाला मुनिया, सुगरण, सूर्यपक्षी, चष्मेवाला या सा:या पक्ष्यांच्या प्रजननाचा हाच काळ. मात्र यातला एकही पक्षी आपल्याला दिसला नसल्याचे जठार यांनी सांगितले. मुनियाला घरटी बांधण्यासाठी लांब पाती लागतात. पाऊस न पडल्याने या पाती कशा मिळणार? आता उशिरा पाऊस पडला तर या पक्ष्यांचा पाळणा उशिरा हालेलही; पण त्यांना मिळणा:या अन्नावर आणि पुढील जीवनचक्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे जठार म्हणाले. 
आपल्याकडे सर्रास आढळणारा राष्ट्रीय पक्षी मोर याच काळात नाल्याच्या किनारी, टेकडीच्या उतारावर आपली घरटी बांधतो. पावसामुळे कीटकांची संख्या वाढते. त्यामुळे मोरांना, त्यांच्या पिलांना प्रजनन काळात अन्नाची कमतरता भासत नाही. मात्र, पाऊसच लांबल्याने सारेच चक्र थांबले आहे. अशीच स्थिती तितर या पक्ष्याची आहे. उत्तरेकडून येणा:या नवरंगलाही कमी पावसाचा फटका बसत आहे. तो साधारण मे महिन्यात येतो. जून-जुलैमध्ये पाणथळीच्या ठिकाणी घरटी बांधतो. निळ्या शेपटीचा वेडा राघू उत्तरेकडूनच येतो. अन्नाजवळ म्हणजे नद्यांच्या थडी-कपारीमध्ये तो आपले घर सजवितो. छोटे किडे-फुलपाखरे हे त्यांचे अन्न. जुलै महिन्यात तर तो परतीच्या प्रवासाला निघतो. मात्र, पाऊसच लांबल्याने किडय़ांच्या-फुलपाखरांच्या संख्येवर परिणाम झाला. पोटभर खाऊन अंडी देण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या या पक्ष्याचा आता पुढील प्रवास बदलेल. पाऊस उशिरा आल्यास कदाचित त्याला आपला मुक्काम वाढवावा लागेल, अशी माहिती अमरावती येथील पक्षीनिरीक्षक यादव तरटे यांनी ‘लोकमत’ला दिली.  समूहाने घरटी करणारे मोठा बगळा, छोटा बगळा, पाणकावळा या पक्ष्यांच्या जीवनमानावरही विपरीत परिणाम जाणवत आहे. 
पाणी भरपूर असेल तर भरपूर मासे निर्माण होतात. त्यामुळे त्यांना भरपूर अन्नही मिळते. पुढे पिलांच्या अन्नाचा प्रश्नही मिटतो. पावसाअभावी हे सारेच थांबले आहे.  
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक संजय करकरे यांनीही मान्सून लांबल्याचा पक्ष्यांना फटका कसा बसू शकतो याचे उदाहरण दिले. काही वर्षापूर्वी असाच पावसाळा लांबला होता. कोल्हापुरात तब्बल 23 दिवस पाऊसच नव्हता. सुगरण पक्ष्याने (नर) या काळात आपले घरटे अर्धवट अवस्थेत सोडले होते. अशी एक नव्हे अनेक घरटी होती, असे त्यांनी सांगितले. 
 
सुगरणीचा संसार 
घरटी बांधताना सुगरण हा पक्षी सर्वाधिक मेहनत घेतो, नर पक्षी घरटे बांधतो. या पक्ष्याचे डोके व छातीचा भाग पिवळा चमकदार असतो. पाऊस सुरू झाल्यावर त्याचे पंख दाट होऊ लागतात. पिलांना जन्म दिल्यानंतर मादीचे पंख गळू लागतात. ही घरटी भारतात सर्वत्र आढळतात. शेतातील पिके, किडे हे त्याचे आवडते अन्न. सुगरणीच्या झुंडीत मादींची संख्या अधिक असते. त्यामुळे एक नर दोन किंवा त्यापेक्षा अधिक मादींशी संसार करतो. मात्र पाऊसच न झाल्याने त्यांचे जीवनचक्र थांबले आहे.