शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वनतोडीमुळे मान्सून चक्र बिघडले

By admin | Updated: August 25, 2016 05:32 IST

समुद्राच्या पाण्याचे तापमान असेच वाढत राहिले तर भविष्यात समुद्र आटून जाईल आणि त्याचा परिणाम मान्सूनवर होईल.

मुंबई : समुद्राच्या पाण्याचे तापमान असेच वाढत राहिले तर भविष्यात समुद्र आटून जाईल आणि त्याचा परिणाम मान्सूनवर होईल. परिणामी मान्सूनचे वेळापत्रक आणखी बिघडेल, अशी भीती मुंबई आयआयटीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या कारणात्सव मान्सून व्यवस्थित पाहिजे असेल तर औद्योगिकरणासाठी सुरु असलेली वृक्षांची तोड ताबडतोब थांबवा. अन्यथा विनाशाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही आयआयटीच्या अहवालात देण्यात आला आहे.जून-जुलै महिना सुरु झाला की मान्सूनचे वेध लागतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे वेळापत्रक बिघडले आहे. आता तर जून आणि जुलै महिन्यात पाऊस पडेल की नाही? याचीही शाश्वती देता येत नाही. या हवामान बदलाचा आयआयटी मुंबईने अभ्यासपुर्ण अहवाल सादर केला आहे. मागील काही वर्षांत औद्योगिकरणाच्या नावाखाली जंगलांची तोड होत असल्याचे उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांतून समोर येत आहे. याबाबत आयआयटी मुंबईचे विभाग प्राध्यापक शुभिमल घोष आणि हवामान अभ्यासक सुपंथा पॉल यांनी अभ्यास केला आहे. अभ्यासानुसार, देशातील जंगलांची तोड करून त्या जागेचा वापर शेतीसाठी केला जात आहे. याचा परिणामी हवामानावर होत आहे. तापमानात होणारी वाढ हे त्याचेच उदाहरण आहे. उत्तर पूर्व आणि ईशान्य भारताचा विचार करता १९८० आणि २००० या कालावधीत जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. आणि त्याचा परिणाम मान्सूनवर झाला आहे.>उपायांसाठी सरकारने पुढे यावेफॉरेस्ट सर्व्हे आॅफ इंडियाच्या अहवालानुसार २००९ पासून जंगलात घट झाली आहे. याचा परिणाम मान्सूनवर झाला आहे. २००९ पासूनचे अहवाल अभ्यासले तर १० ते १२ चौरस किलोमीटर जंगल दरवर्षी शेतजमिनीखाली येते. त्यामुळे निसर्गाचा हानी होते. आयआयटीने यावर अभ्यास केला ही चांगली गोष्ट आहे. पण आता यावर उपायांसाठी सरकारने पुढे आले पाहिजे- किशोर रिठे, हवामान अभ्यासक