शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

मक्तेदारी कंत्राट निविदा रद्द

By admin | Updated: July 14, 2016 03:45 IST

केंद्र सरकारकडून अंशत: निधी दिल्या जाणाऱ्या एकात्मिक महिला-बाल कल्याण योजनेअंतर्गत अंगणवाड्यांच्या माध्यमातून सहा वर्षांपर्यंतची बालके, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा

औरंगाबाद: केंद्र सरकारकडून अंशत: निधी दिल्या जाणाऱ्या एकात्मिक महिला-बाल कल्याण योजनेअंतर्गत अंगणवाड्यांच्या माध्यमातून सहा वर्षांपर्यंतची बालके, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना पूरक आहार पुरविण्याची निविदा काढताना प्रकल्पांची संख्या आधीच्या ५५३ वरून कमी करून ७० करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे.राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण खात्याने यासाठी यंदाच्या ८ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या निविदा सूचनेतील अन्य पात्रता अटी न्यायालयाने कायम ठेवल्या असल्या तरी ‘एक्स्ट्रुुजन टेक्नॉलॉजी’ (पूर्णपणे स्वचलित संयत्र)च्या अटींची पूर्तता करणारे किती पुरवठादार राज्यात उपलब्ध आहेत याचे सरकारने आधी सर्वेक्षण करावे व त्यानंतर प्रकल्पांची संख्या निश्चित करावी व त्यानुसार नव्याने निविदा सूचना प्रसिद्ध करावी, असा आदेश न्यायालयाने दिला.बीड, अहमदनगर, नंदुरबार, धुळे आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील सुमारे ३५ महिला बचत गटांनी केलेल्या याचिकांवर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. के. के. सोनावणे यांच्या खंडपीठाने सोमवारी हा आदेश दिला. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील ९५,६१३ अंगणवाड्योंच्या माध्यमांतून उपर्युक्त तीन वर्गांतील सुमारे ५२ लाख लाभार्थींना पूरक सकस आहार ‘टेक होम रेशन’च्या स्वरूपात पुरविला जातो. सन २०१६-१७ पासून पुढील तीन वर्षांच्या पुरवठा कंत्राटांसाठी ही निविदा काढण्यात आली होती व तीन वर्षांत मिळून त्यावर सुमारे ६,३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.याआधी सन १०१४ मध्ये अशी कंत्राटे देताना संपूर्ण राज्याची विभागणी ५५३ प्रकल्पांमध्ये करून त्याची कंत्राटे स्थानिक पातळींवर ३१४ महिला बचत गट व महिला मंडळांना दिली होती. त्यापैकी बव्हंशी पुरवठादारांनी सरकारने घातलेल्या अटीनुसार आधी अर्धस्वचलित व नंतर पूर्णपणे स्वचलित संयत्र बसविण्यासाठी मोठा खर्च केला आहे. असे असताना प्रकल्पसंख्या नागरी भागांसाठी ३५ व ग्रामीण भागांसाठी ३५ अशी मिळून फक्त ७०वर मर्यादित केल्याने सध्या पुरवठा करणारे जे पात्र महिला बचत गट आहेत त्यांना काम मिळणार नाही व काही मोजक्या संस्थांची मक्तेदारी निर्माण होईल, असे नमूद करून न्यायालयाने हा निकाल दिला.या कार्यक्रमानुसार पूरक सकस आहार पुरविण्याच्या कामाचे होता होईतो विकेंद्रिकरण करावे व लहान क्षेत्रांसाठी प्रकल्प गट तयार करून त्यानुसार पुरवठ्याची कंत्राटे स्थानिक महिला बचत गट व महिला मंडळांना अग्रक्रमाने द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. राज्य सरकारने त्या प्रकरणांमध्ये प्रतिज्ञापत्रे करून असे विकेंद्रिकरण करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आगामी वर्षांच्या निविदांसाठी प्रकल्प गटांची संख्या आधीच्या ५५३ वरून एकदम ७० एवढी कमी करणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला धरून होणार नाही, असेही खंडपीठाने म्हटले.निविदा प्रक्रिया कशी असावी यावर विविध खात्यांमध्ये मतभेद झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून हा विषय मंत्रिमंडळापुढे नेण्यात आला. होता. (विशेष प्रतिनिधी)