शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

मोदींचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा

By admin | Updated: November 24, 2014 03:03 IST

वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून भाजपाने ‘यू टर्न’ घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता.

नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून भाजपाने ‘यू टर्न’ घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता. पंतप्रधानांचा वेगळ््या विदर्भाला विरोध नाही. पक्षानेच यासंदर्भात ठराव मान्य केला असून, वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीला भाजपाचा पाठिंबा आहे. योग्य वेळी विदर्भ राज्याची निर्मिती होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.नागपुरात ‘वेद’तर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट) आयोजित ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेंट’ या चर्चासत्रादरम्यान नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी ही माहिती दिली.मोदी यांनी मुंबईसंदर्भात वक्तव्य करताना राज्य तुटू देणार नाही, असे म्हटले होते. वेगळ््या विदर्भाला पंतप्रधानांचा विरोध असल्याचा अपप्रचार होत आहे. मुळात त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला होता, असा खुलासा करतानाच वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीसाठी काँग्रेसनेही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आजपर्यंत विदर्भाचा विकास झाला नाही, त्यासाठी येथील नेतेच ७५ टक्के जबाबदार आहेत. नवीन राज्य निर्माण झाल्यावर विकास होईलच, यात पूर्ण तथ्य नाही. त्यासाठी योग्य नेतृत्व, नेतृत्वाला विकासदृष्टी आणि निर्णयक्षमता आवश्यक असते. भाजपाने वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीचा ठराव अगोदरच मंजूर केला आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत व त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे ते म्हणाले. देशात ‘वन मॅन शो’ सुरू नसून लोकशाही पद्धतीनेच निर्णय घेतले जातात, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र वेगळ््या विदर्भाची निर्मिती करणे योग्य नसल्याचे मत मांडले. वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीमुळे विकास होईलच, असे नाही.विदर्भातील जनतेचा यामुळे फारसा फायदा होणार नाही, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मांडली. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी या चर्चासत्राचे संचालन केले. यावेळी त्यांच्या ‘२०१४ : इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तकाचे नितीन गडकरी व पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.