शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

सचिवांसाठी राज्यातही आता ‘मोदी पॅटर्न’

By admin | Updated: July 13, 2016 04:05 IST

नव्या मंत्र्यांच्या कार्यालयात काम करण्याची इच्छा ठेवून अनेकांनी वशिल्यांचे खलिते पाठवणे सुरू केले असले, तरी या मंत्र्यांनी व्यक्तिगत स्टाफविषयी कमालीचे मौन बाळगले आहे.

अतुल कुलकर्णी,  मुंबईनव्या मंत्र्यांच्या कार्यालयात काम करण्याची इच्छा ठेवून अनेकांनी वशिल्यांचे खलिते पाठवणे सुरू केले असले, तरी या मंत्र्यांनी व्यक्तिगत स्टाफविषयी कमालीचे मौन बाळगले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तेच अधिकारी आपण घेऊ, असे नवे मंत्री सांगत आहेत.केंद्रातही नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्याही मंत्र्यांना त्यांच्या पसंतीचे अधिकारी घेऊ दिले नव्हते. त्याचीच पुनरावृत्ती राज्यात फडणवीस यांनी केल्याचे बोलले जात आहे. नव्या मंत्र्यांकडे जे-जे अधिकारी आपले बायोडाटा घेऊन जात आहेत, त्यांना ‘मुख्यमंत्री आल्यानंतर पाहू’ असे एकच उत्तर ऐकायला मिळत आहे. एका जुन्या मंत्र्याने त्याच्या कडील स्वीय सचिवास तुमच्याकडे घ्या, असा निरोप नव्या मंत्र्यांना पाठवले. तो निरोप त्या मंत्र्याने जशास तसा मुख्यमंत्र्यांकडे रवाना केला. नवीन आलेली टीम पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणात असल्याचे हे निदर्शक आहे, असेही एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी मंत्री कार्यालयात दहा वर्षे काम केले आहे, त्यांना पुन्हा नव्याने मंत्री कार्यालयात घेऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी काढले होते. त्यातून अधिकाऱ्यांवर पक्षीय ठप्पे मारू नका, अशी मागणीही झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यास नकार दिला. तरीही तो आदेश डावलून ‘लोन बेसीस’ अशी नवी युक्ती अधिकाऱ्यांनी काढली. त्याचा आधार घेत, आजही काही मंत्र्यांकडे लोन बेसिसवर अधिकारी कार्यरत आहेतच. मुख्यमंत्री परत येईपर्यंत नवे मंत्री थांबणार की, त्यांना जे अधिकारी दिले जातील तेच घेणार? हा नजीकच्या काळात कळीचा प्रश्न बनणार आहे.