शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा मोदींचा निर्णय चुकीचा - स्वामी अग्निवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 15:50 IST

भारत-पाकिस्तान मधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'सार्क' परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय चुकीचा होता असे वक्तव्य स्वामी अग्निवेश यांनी केले.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - रत-पाकिस्तान मधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'सार्क' परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय चुकीचा होता असे वक्तव्य स्वामी अग्निवेश यांनी केले. कितीही मोठे संकट असले तरी, त्यावर संवादाने मार्ग निघू शकतो, चर्चा हेच कोणत्याही वादावर प्रभावी माध्यम असू शकते, असे स्वामी अग्नीवेश यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच सर्जिकल स्ट्राईक ही देशासाठी नवीन गोष्ट नाही. या पुढे देखील संरक्षणासाठी याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे आत्ता त्याचा इतका गाजावाजा करणे गरजेचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
पत्रकार भवन येथे स्वामी अग्नीवेश यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकारसंघाचे अध्यक्ष गजेंद्र बढे, सरचिटणीस अजय कांबळे, पुणे पत्रककार प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कुटे या वेळी उपस्थित होते. उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन विविध आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना स्वामी अग्नीवेश म्हणाले, देशातील विविध प्रश्नांवर संवाद करण्यासाठी संसद, आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चेसाठी संयुक्त राष्ट्रसंघ जसे महत्त्वाचे आहे, तसेच सार्क परिषद आशियाई देशांसाठी महत्त्वाची आहे. मात्र आपल्या पंतप्रधानांनी सार्क रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. संवादाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असतते. उलट आतंकवाद विरोधी लढ्यासाठी इस्लामाबाद येथे होत असलेल्या सार्क परिषदेचा उपयोग करता आला असता. त्यात आतंकवादा विरोधात लढा देण्यासाठी सार्क देशांचे संयुक्त सैन बनविण्याबातची भूमिका देखील मांडायला हवी होती.