शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शहांच्या हाती मुंबईचे राजकारण!

By admin | Updated: November 22, 2015 02:55 IST

मुंबई व मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे महत्त्व आता कमी झाले असून, त्याबाबतचे सर्व राजकारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

- (डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी)

मुंबई व मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे महत्त्व आता कमी झाले असून, त्याबाबतचे सर्व राजकारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून केले जात आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर संभाजी भगत यांनी शनिवारी येथे केले.१६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात ‘मुंबईचे राजे.. मुंबईचे रंक’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकार शैक्षणिक व सांस्कृतिक धोरणामध्ये बदल घडवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) सांस्कृतिक दहशतवाद देशात पसरवित असल्याची टीका केली. साहित्य संमेलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सत्रामध्ये भगत यांच्यासह कोमसापचे संमेलनाध्यक्ष जयंत पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, भारतकुमार राऊत, मुंबईचे अभ्यासक सुहास सोनावणे आणि अरुण पुराणिक या तज्ज्ञांनी बदलत्या मराठी महामुंबईबद्दल आपली भूमिका तपशीलवारपणे विशद केली. लोकशाहीर भगत म्हणाले की, मराठीचे राजकारण करणाऱ्यांनी पहिल्यांदा धारावीचे राजकारण, तेथील सामाजिक स्थितीचा अभ्यास केला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, मोदी आणि अमित शहा यांच्या हाती मराठीच्या राजकारणाचा कंट्रोल गेला आहे. त्यामुळे जातीयवादी लोक शहरांच्या विकासाला जातीय रंग देत आहेत. आरएसएस देशात सांस्कृतिक दहशतवाद पसरवित असून, केंद्र सरकार त्यांचा छुपा अंजेडा राबवित असल्याची टीका त्यांनी केली. प्रकाश अकोलकर म्हणाले, ‘एका सर्वेक्षणानुसार २०२५ सालापर्यंत मुंबापुरीची लोकसंख्या अडीच कोटींच्या घरात पोहोचणार आहे. त्यामुळे त्या वेळी उद्भविणाऱ्या समस्या विचारात घेऊन आतापासून उपाययोजना राबविण्याची गरज आहे.कोमसापचे संमेलनाध्यक्ष जयंत पवार म्हणाले, ‘ज्यांच्या हातात पैसा त्यांच्याच हाती मुंबईची सत्ता असे समीकरण बनले आहे. गेली कित्येक वर्षे बिल्डर, माफिया आणि सत्ताधारी यांच्याच हातात या महानगराची सूत्रे राहिलेली असून, ही शोषणाची साखळी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे कष्टकरी समाज हद्दपार होत चालला आहे. (प्रतिनिधी)