शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
"ठाकरे बंधू बोलबच्चन...बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
3
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
4
सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
7
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
8
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
9
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
10
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
11
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
12
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
13
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
14
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
15
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
16
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
17
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
18
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
19
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
20
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...

मोदी-शहांच्या हाती मुंबईचे राजकारण!

By admin | Updated: November 22, 2015 02:55 IST

मुंबई व मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे महत्त्व आता कमी झाले असून, त्याबाबतचे सर्व राजकारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

- (डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी)

मुंबई व मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे महत्त्व आता कमी झाले असून, त्याबाबतचे सर्व राजकारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून केले जात आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर संभाजी भगत यांनी शनिवारी येथे केले.१६व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात ‘मुंबईचे राजे.. मुंबईचे रंक’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकार शैक्षणिक व सांस्कृतिक धोरणामध्ये बदल घडवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) सांस्कृतिक दहशतवाद देशात पसरवित असल्याची टीका केली. साहित्य संमेलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सत्रामध्ये भगत यांच्यासह कोमसापचे संमेलनाध्यक्ष जयंत पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, भारतकुमार राऊत, मुंबईचे अभ्यासक सुहास सोनावणे आणि अरुण पुराणिक या तज्ज्ञांनी बदलत्या मराठी महामुंबईबद्दल आपली भूमिका तपशीलवारपणे विशद केली. लोकशाहीर भगत म्हणाले की, मराठीचे राजकारण करणाऱ्यांनी पहिल्यांदा धारावीचे राजकारण, तेथील सामाजिक स्थितीचा अभ्यास केला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, मोदी आणि अमित शहा यांच्या हाती मराठीच्या राजकारणाचा कंट्रोल गेला आहे. त्यामुळे जातीयवादी लोक शहरांच्या विकासाला जातीय रंग देत आहेत. आरएसएस देशात सांस्कृतिक दहशतवाद पसरवित असून, केंद्र सरकार त्यांचा छुपा अंजेडा राबवित असल्याची टीका त्यांनी केली. प्रकाश अकोलकर म्हणाले, ‘एका सर्वेक्षणानुसार २०२५ सालापर्यंत मुंबापुरीची लोकसंख्या अडीच कोटींच्या घरात पोहोचणार आहे. त्यामुळे त्या वेळी उद्भविणाऱ्या समस्या विचारात घेऊन आतापासून उपाययोजना राबविण्याची गरज आहे.कोमसापचे संमेलनाध्यक्ष जयंत पवार म्हणाले, ‘ज्यांच्या हातात पैसा त्यांच्याच हाती मुंबईची सत्ता असे समीकरण बनले आहे. गेली कित्येक वर्षे बिल्डर, माफिया आणि सत्ताधारी यांच्याच हातात या महानगराची सूत्रे राहिलेली असून, ही शोषणाची साखळी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे कष्टकरी समाज हद्दपार होत चालला आहे. (प्रतिनिधी)