शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

‘मोडक सागर’ भरला

By admin | Updated: July 16, 2017 01:16 IST

तलाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तलावाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी ६.३२ वाजता

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तलाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तलावाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी ६.३२ वाजता भरून वाहू लागला. या तलावातून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. अन्य तलावांतही पाण्याची पातळी वाढत असल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन लवकरच मिटणार आहे.अपुऱ्या पावसाने २०१५ मध्ये मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या काळात मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. परंतु गेल्या वर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचे टेन्शन नव्हते. मधल्या काळात मध्य वैतरणा जलवाहिनीनेही मुंबईचा जलसाठा वाढवला. त्यामुळे मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे.या वर्षी पावसाने चांगला जोर धरला आहे. त्यामुळे प्रमुख तलावांपैकी एक असलेला मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी भरल्याने धरणाचे दोन दरवाजे खुले करण्यात आले आहेत. या तलावापाठोपाठ मुंबईतील विहार तलावही लवकरच भरून वाहण्याच्या मार्गावर आहे. मात्र मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी साडेचौदा लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे.मुंबईला दररोज 3750दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा होतो.मुंबईत पाण्याची मागणी दररोज 4200दशलक्ष लीटर्स एवढी आहे.रोज २५ ते ३० टक्के म्हणजे सुमारे ९०० लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जाते.गतवर्षी हा तलाव १ आॅगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास ओसंडून वाहू लागला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या ८ लाख ९९ हजार ३८८ द.लि. पाणीसाठा आहे.