शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

तुटपुंज्या मानधनासाठी एड्सग्रस्तांची थट्टा!

By admin | Updated: December 8, 2014 02:16 IST

नियती कितीही निष्ठूर झाली, तरी जगण्याची जिद्द माणसाला त्यावर मात करण्यास शिकवतेच.

सतीश डोंगरे, नाशिकनियती कितीही निष्ठूर झाली, तरी जगण्याची जिद्द माणसाला त्यावर मात करण्यास शिकवतेच. एड्ससारख्या असाध्य आजाराने ग्रासलेले रुग्ण या निराशेतून बाहेर येऊन समाजाच्या उपेक्षेची पर्वा न करता आपले जीवन जगत आहेत; मात्र समाजाप्रमाणेच शासनही एड्सबाधितांची थट्टाच करीत असून, केवळ ४०० रुपये मानधनासाठी त्यांना डझनभर कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. एचआयव्हीबाधित रुग्णांना संजय गांधी योजना, बाल संगोपन योजना, श्रावणबाळ योजना, पोषक आहार योजना, अंत्योदय योजना आदिंच्या माध्यमातून सरकारी मदत म्हणून दरमहा ४०० रुपये मानधन दिले जाते; मात्र या मानधनासाठी एचआयव्हीबाधितांना एक नव्हे तर डझनभर नियमांची पूर्तता करावी लागत असल्याने ‘रोग परवडला, पण मदत नको’ अशी भावना या रुग्णांमध्ये बळावत आहे. कारण वरील कुठल्याही योजनेचा लाभ घेताना संबंधित रुग्ण केवळ एचआयव्हीबाधित असणे पुरेसे नसून, तो दारिद्र्यरेषेखालील असणे गरजेचे असल्याची अट घालण्यात आलेली आहे. ...अन् चिमुकल्याचा गेला बळीजुने नाशिक येथील एचआयव्हीबाधित असलेल्या दहा वर्षीय रितेशने (नाव बदलले आहे) शासनाकडून बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी यासाठी यश फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. हलाखीचे जीवन जगत असलेल्या रितेशला वेळेवर योग्य पोषक आहार मिळत नसल्याने त्याला सरकारी मदतीची अत्यंत गरज होती; परंतु प्रस्ताव मान्य करण्यासाठी डझनभर कागदपत्रांची मागणी केल्याने ती जुळविण्यासाठी रितेशची धडपड अपुरी पडली. त्यातच रितेशची ही झुंज अर्ध्यातच संपुष्टात आली.