शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

कोलंबस वाट का चुकला ?

By admin | Updated: February 18, 2017 14:36 IST

सागरी प्रवास आज जितका सुलभ दिसतो. तसा तो सुरुवातीच्या दिवसांमध्ये नव्हता. हजारो वर्षांपूर्वी सागरी प्रवास सुरु झाला तेव्हा तो अत्यंत धोकादायक होता.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 18 - सागरी प्रवास आज जितका सुलभ दिसतो. तसा तो सुरुवातीच्या दिवसांमध्ये नव्हता. हजारो वर्षांपूर्वी सागरी प्रवास सुरु झाला तेव्हा तो अत्यंत धोकादायक होता. सुरुवातीच्या काळात धाडसी दर्यावर्दी समुद्रात आपल्या होडया झोकून द्यायचे. पण किनारा नजरेआड गेली की, काय अनर्थ ओढवेल हे माहिती नसल्यामुळे समुद्राच्या कडेकडेने आपली होडी हाकारायचे. 
 
पुढे हळूहळू अनुभव आणि वेगवेगळया प्रयोगांमधून प्रमाण, दिशा, आक्षांश, रेखांश, निश्चित करुन समुद्रात विविध दिशांना प्रवास सुरु झाला. त्याचवेळी ओंडक्याच्या मदतीने जहाजाचा वेग मोजायची पद्धत विकसित केली. आता स्पीड लॉग या अत्याधुनिक उपकरणाने जहाजाचा वेग मोजतात.  
 
कोलंबसच्या काळात 15 व्या शतकात समुद्रातून वाट शोधण्याच्या वेगवेगळया पद्धती अवगत होत्या. तरीही कोलंबस वाट का चुकला ? युरोपियन दर्यावर्दी त्यावेळी अॅस्ट्रोलेब, दुर्बिणीचा वापर करायचे. पण प्रश्न होता रेखांशाचा. त्या काळात अचूकपणे रेखांश मोजण्याचे गणित सुटलेले नव्हते. त्यामुळे पूर्व-पश्चिम दिशेने आपण किती अंतर आलोय हे कोणालाही खात्रीने सांगता येत नव्हते. अशा परिस्थितीत भारताचे रेखांश माहिती नसलेला कोलंबस पश्चिमेकडे निघाला आणि समोर जो पहिला भूभाग दिसला त्याला भारत समजून बसला. 
 
- महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या पत्रिकेतील कॅप्टन सुनील सुळे यांच्या लेखातील काही भाग बातमीरुपाने प्रसिद्ध केला आहे.