शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

कारवाईबाबत दिशाभूल

By admin | Updated: January 17, 2017 04:38 IST

बेकायदा बांधकामे हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

कल्याण : पश्चिमेत जुना रेतीबंदर रोड येथील बेकायदा कत्तलखाना बंद करणे तसेच तेथील बेकायदा बांधकामे हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, महापालिकेकडून या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. तसेच याप्रकरणी दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते व याचिकाकर्ते गुलाम आंबिलकर यांनी केला आहे. हा प्रकार निदर्शनास आणून देण्यासाठी लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. आंबिलकर हे इस्लाम धर्माची पुस्तके व अत्तरविक्रेते आहेत. ते जुबेदा प्लाझा येथे राहतात. जुना रेतीबंदर रोड, गोविंदवाडी परिसरात बेकायदा कत्तलखाना सुरू आहे. तेथे कत्तल केलेल्या जनावरांची चरबी वितळवण्याची भट्टी चालवली जाते. त्यामुळे पत्रीपूल परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा त्रास होतो. हा बेकायदा कत्तलखाना व चरबी वितळवणारी भट्टी हटवण्यासाठी महापालिकेकडे आंबिलकर यांनी तक्रार अर्ज केला. यासाठी ते दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि गृहखात्याकडे पत्रव्यवहार केला. तसेच माहितीच्या अधिकारात महापालिकेकडे माहिती मागवली. त्यांना दिलेल्या माहितीतही चुकीची माहिती दिली आहे, असा आरोप आंबिलकर यांनी केला आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाकडून आंबिलकर यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने आंबिलकर यांनी स्वखर्चाने बेकायदा कत्तलखाना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने याप्रकरणी महापालिकेस व प्रदूषण नियंत्रण मंडळास आदेश दिले. प्रथम हा बेकायदा कत्तलखाना बंद करावा. तसेच बेकायदा कत्तलखान्याचे बांधकाम पाडून टाकावे. त्याआधी याचिकाकर्त्याकडून या प्रकरणाचे सादरीकरण घ्यावे. त्यानंतरच याप्रकरणाची याचिका निकाली काढली, असे समजावे. आंबिलकर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेस प्रकरणाची सर्व माहिती सादर केली आहे. (प्रतिनिधी) >न्यायालयाचा आदेश धाब्यावरमहापालिकेने न्यायालयास सांगितले आहे की, संबंधित कत्तलखाना बंद करण्यात आला आहे. तसेच हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, अशी लेखी माहिती लोकायुक्तांकडे दिली आहे. मात्र, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशापूर्वी महापालिकेच्या बेकायदा बांधकामविरोधी विभागाच्या उपायुक्तांनी बेकायदा कत्तलखान्याचे बांधकाम पाडून टाकण्याचे आदेश दिले होते. उपायुक्त व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणीच झालेली नाही. लोकायुक्तांना महापालिकेने दिलेली माहितीच दिशाभूल करणारी आहे. तसेच या माहितीत तथ्य नाही. याप्रकरणी आंबिलकर यांनी पुन्हा लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहोत, असे आंबिलकर यांनी सांगितले.