शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमुळेच मीरा-भार्इंदर मेट्रोला मंजुरी

By admin | Updated: April 4, 2017 04:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भार्इंदर मेट्रोला दिलेली मंजुरी केवळ महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली आहे.

भार्इंदर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भार्इंदर मेट्रोला दिलेली मंजुरी केवळ महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली आहे. नागरिकांना खरोखरीच मेट्रोची सुविधा मनापासून द्यायची असती, तर भाजपा सरकारने मीरा-भार्इंदर मेट्रो ही अंधेरी-दहिसर पूर्व मेट्रोलाच जोडून त्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद करायला हवी होती, अशी टीका काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी केली. २००९-१० साली महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्यात आले होते. त्याचबरोबर तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या सहकार्याने जपानच्या जेआयसीए संस्थेमार्फत कर्ज उपलब्ध करुन मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यात आली. सध्या सुरु असलेल्या सर्वच मेट्रो प्रकल्पांना याच जपानी कंपनीमार्फत निधी मिळत आहे, याचा दाखला देत त्यांनी मेट्रो प्रकल्पांचे श्रेय भाजपाचे नाही. ते लाटण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याकडे बोट दाखवले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी २००६ साली त्यांना मीरा-भार्इंदरसाठी, रस्ते, पाणीपुरवठा आदी विविध योजना तयार करण्याचे पत्र दिले होते. त्यात मेट्रोचासुध्दा समावेश होता. एमएमआरडीएनेही त्यांच्या वाहतुकीसाठीच्या २००८-०९ च्या आराखड्यात दहिसरपासून मीरा-भार्इंदर व पुढे वसई-विरार असा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला होता. उलट भाजपा सरकारने मीरा-भार्इंदरला मेट्रोतून वगळल्याने काँग्रेससह नागरिकांच्या संघटनेने आंदोलने केली होती, याचा दाखलाही त्यांनी दिला आणि आता केलेली घोषणा फसवी, दिखाऊ असल्याची टीका केली. आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी आता मेट्रोच्या मंजुरीची घोषणा केली आहे. पण केवळ घोषणा करून व नारळ फोडून चालणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष तरतुदीची गरज आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुका आॅगस्टमध्ये होत असल्याने नागरिकांना भुलविण्यासाठी भाजपाने केवळ मेट्रोचे गाजर दाखवू नये. अंधेरी-दहिसर पूर्व या मेट्रोच्या मंजुर टप्प्यालाच मीरा-भार्इंदर मेट्रो जोडून लगेचच त्याचे काम सुरू करावे, असे हुसेन यांनी सुचवले. या कामासाठी सरकारने निधीची तरतुदच केलेली नाही. राज्य सरकारने याच वर्षात दोन हजार कोटी मेट्रोसाठी द्यावेत. त्यातून ते या प्रकल्पासाठी किती गंभीर आहेत, ते नागरिकांना समजले. अन्यथा नंतर निधीच मिळाला नाही किंवा तो तुटपुंजा दिला, तर मेट्रोच्या मंजुरीचा निर्णय केवळ पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला, असे दिसून येईल आणि त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुका आॅगस्टमध्ये होत असल्याने नागरिकांना भुलविण्यासाठी भाजपाने केवळ मेट्रोचे गाजर दाखवू नये. अंधेरी-दहिसर पूर्व या मेट्रोच्या मंजुर टप्प्यालाच मीरा-भार्इंदर मेट्रो जोडून लगेचच त्याचे काम सुरू करावे, असे हुसेन यांनी सुचवले. या कामासाठी सरकारने निधीची तरतुदच केलेली नाही. राज्य सरकारने याच वर्षात दोन हजार कोटी मेट्रोसाठी द्यावेत. त्यातून ते या प्रकल्पासाठी किती गंभीर आहेत, ते नागरिकांना समजले. अन्यथा नंतर निधीच मिळाला नाही किंवा तो तुटपुंजा दिला, तर मेट्रोच्या मंजुरीचा निर्णय केवळ पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला, असे दिसून येईल आणि त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी टीकाही त्यांनी केली.