शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

निवडणुकांमुळेच मीरा-भार्इंदर मेट्रोला मंजुरी

By admin | Updated: April 4, 2017 04:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भार्इंदर मेट्रोला दिलेली मंजुरी केवळ महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली आहे.

भार्इंदर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भार्इंदर मेट्रोला दिलेली मंजुरी केवळ महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली आहे. नागरिकांना खरोखरीच मेट्रोची सुविधा मनापासून द्यायची असती, तर भाजपा सरकारने मीरा-भार्इंदर मेट्रो ही अंधेरी-दहिसर पूर्व मेट्रोलाच जोडून त्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद करायला हवी होती, अशी टीका काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी केली. २००९-१० साली महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्यात आले होते. त्याचबरोबर तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या सहकार्याने जपानच्या जेआयसीए संस्थेमार्फत कर्ज उपलब्ध करुन मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यात आली. सध्या सुरु असलेल्या सर्वच मेट्रो प्रकल्पांना याच जपानी कंपनीमार्फत निधी मिळत आहे, याचा दाखला देत त्यांनी मेट्रो प्रकल्पांचे श्रेय भाजपाचे नाही. ते लाटण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याकडे बोट दाखवले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी २००६ साली त्यांना मीरा-भार्इंदरसाठी, रस्ते, पाणीपुरवठा आदी विविध योजना तयार करण्याचे पत्र दिले होते. त्यात मेट्रोचासुध्दा समावेश होता. एमएमआरडीएनेही त्यांच्या वाहतुकीसाठीच्या २००८-०९ च्या आराखड्यात दहिसरपासून मीरा-भार्इंदर व पुढे वसई-विरार असा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला होता. उलट भाजपा सरकारने मीरा-भार्इंदरला मेट्रोतून वगळल्याने काँग्रेससह नागरिकांच्या संघटनेने आंदोलने केली होती, याचा दाखलाही त्यांनी दिला आणि आता केलेली घोषणा फसवी, दिखाऊ असल्याची टीका केली. आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी आता मेट्रोच्या मंजुरीची घोषणा केली आहे. पण केवळ घोषणा करून व नारळ फोडून चालणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष तरतुदीची गरज आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुका आॅगस्टमध्ये होत असल्याने नागरिकांना भुलविण्यासाठी भाजपाने केवळ मेट्रोचे गाजर दाखवू नये. अंधेरी-दहिसर पूर्व या मेट्रोच्या मंजुर टप्प्यालाच मीरा-भार्इंदर मेट्रो जोडून लगेचच त्याचे काम सुरू करावे, असे हुसेन यांनी सुचवले. या कामासाठी सरकारने निधीची तरतुदच केलेली नाही. राज्य सरकारने याच वर्षात दोन हजार कोटी मेट्रोसाठी द्यावेत. त्यातून ते या प्रकल्पासाठी किती गंभीर आहेत, ते नागरिकांना समजले. अन्यथा नंतर निधीच मिळाला नाही किंवा तो तुटपुंजा दिला, तर मेट्रोच्या मंजुरीचा निर्णय केवळ पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला, असे दिसून येईल आणि त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुका आॅगस्टमध्ये होत असल्याने नागरिकांना भुलविण्यासाठी भाजपाने केवळ मेट्रोचे गाजर दाखवू नये. अंधेरी-दहिसर पूर्व या मेट्रोच्या मंजुर टप्प्यालाच मीरा-भार्इंदर मेट्रो जोडून लगेचच त्याचे काम सुरू करावे, असे हुसेन यांनी सुचवले. या कामासाठी सरकारने निधीची तरतुदच केलेली नाही. राज्य सरकारने याच वर्षात दोन हजार कोटी मेट्रोसाठी द्यावेत. त्यातून ते या प्रकल्पासाठी किती गंभीर आहेत, ते नागरिकांना समजले. अन्यथा नंतर निधीच मिळाला नाही किंवा तो तुटपुंजा दिला, तर मेट्रोच्या मंजुरीचा निर्णय केवळ पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला, असे दिसून येईल आणि त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी टीकाही त्यांनी केली.