शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

निवडणुकांमुळेच मीरा-भार्इंदर मेट्रोला मंजुरी

By admin | Updated: April 4, 2017 04:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भार्इंदर मेट्रोला दिलेली मंजुरी केवळ महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली आहे.

भार्इंदर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भार्इंदर मेट्रोला दिलेली मंजुरी केवळ महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली आहे. नागरिकांना खरोखरीच मेट्रोची सुविधा मनापासून द्यायची असती, तर भाजपा सरकारने मीरा-भार्इंदर मेट्रो ही अंधेरी-दहिसर पूर्व मेट्रोलाच जोडून त्यासाठी दोन हजार कोटींची तरतूद करायला हवी होती, अशी टीका काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी केली. २००९-१० साली महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्यात आले होते. त्याचबरोबर तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या सहकार्याने जपानच्या जेआयसीए संस्थेमार्फत कर्ज उपलब्ध करुन मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यात आली. सध्या सुरु असलेल्या सर्वच मेट्रो प्रकल्पांना याच जपानी कंपनीमार्फत निधी मिळत आहे, याचा दाखला देत त्यांनी मेट्रो प्रकल्पांचे श्रेय भाजपाचे नाही. ते लाटण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याकडे बोट दाखवले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी २००६ साली त्यांना मीरा-भार्इंदरसाठी, रस्ते, पाणीपुरवठा आदी विविध योजना तयार करण्याचे पत्र दिले होते. त्यात मेट्रोचासुध्दा समावेश होता. एमएमआरडीएनेही त्यांच्या वाहतुकीसाठीच्या २००८-०९ च्या आराखड्यात दहिसरपासून मीरा-भार्इंदर व पुढे वसई-विरार असा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला होता. उलट भाजपा सरकारने मीरा-भार्इंदरला मेट्रोतून वगळल्याने काँग्रेससह नागरिकांच्या संघटनेने आंदोलने केली होती, याचा दाखलाही त्यांनी दिला आणि आता केलेली घोषणा फसवी, दिखाऊ असल्याची टीका केली. आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी आता मेट्रोच्या मंजुरीची घोषणा केली आहे. पण केवळ घोषणा करून व नारळ फोडून चालणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष तरतुदीची गरज आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुका आॅगस्टमध्ये होत असल्याने नागरिकांना भुलविण्यासाठी भाजपाने केवळ मेट्रोचे गाजर दाखवू नये. अंधेरी-दहिसर पूर्व या मेट्रोच्या मंजुर टप्प्यालाच मीरा-भार्इंदर मेट्रो जोडून लगेचच त्याचे काम सुरू करावे, असे हुसेन यांनी सुचवले. या कामासाठी सरकारने निधीची तरतुदच केलेली नाही. राज्य सरकारने याच वर्षात दोन हजार कोटी मेट्रोसाठी द्यावेत. त्यातून ते या प्रकल्पासाठी किती गंभीर आहेत, ते नागरिकांना समजले. अन्यथा नंतर निधीच मिळाला नाही किंवा तो तुटपुंजा दिला, तर मेट्रोच्या मंजुरीचा निर्णय केवळ पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला, असे दिसून येईल आणि त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुका आॅगस्टमध्ये होत असल्याने नागरिकांना भुलविण्यासाठी भाजपाने केवळ मेट्रोचे गाजर दाखवू नये. अंधेरी-दहिसर पूर्व या मेट्रोच्या मंजुर टप्प्यालाच मीरा-भार्इंदर मेट्रो जोडून लगेचच त्याचे काम सुरू करावे, असे हुसेन यांनी सुचवले. या कामासाठी सरकारने निधीची तरतुदच केलेली नाही. राज्य सरकारने याच वर्षात दोन हजार कोटी मेट्रोसाठी द्यावेत. त्यातून ते या प्रकल्पासाठी किती गंभीर आहेत, ते नागरिकांना समजले. अन्यथा नंतर निधीच मिळाला नाही किंवा तो तुटपुंजा दिला, तर मेट्रोच्या मंजुरीचा निर्णय केवळ पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला, असे दिसून येईल आणि त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी टीकाही त्यांनी केली.