शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

...तर मंत्र्यांना बायकाच बडवतील!

By admin | Updated: July 29, 2016 01:22 IST

सत्ता येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी महागाई कमी झाली का, एवढं फक्त आपल्या बायकांना विचारा. तुम्हाला तुमच्या बायकाच लाटणं घेऊन बडवतात की नाही बघा, अशा शब्दात

मुंबई : सत्ता येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी महागाई कमी झाली का, एवढं फक्त आपल्या बायकांना विचारा. तुम्हाला तुमच्या बायकाच लाटणं घेऊन बडवतात की नाही बघा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत भाजपा-शिवसेनेच्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. महागाई, बेरोजगारी तसेच कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांच्या वतीने चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेला सुरुवात करताना पवारांनी हा हल्लाबोल केला. निवडणुकीच्या काळात कोणकोणती आश्वासने तुम्ही दिली होती हे आठवा. सह्याद्रीवर बसून त्यांचा आढावा घ्या. पाळलेली आश्वासने दिसत नाहीत हे पाहून तुमची झोप उडेल त्या दिवशी राज्याच्या हिताचे निर्णय होऊ लागतील, असे पवार यांनी बजावले. अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारला, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा?’ असा सवाल करावासा वाटतो. नुसती जाहिरातबाजी सुरु आहे. मोठमोठे दावे केले जात आहेत. जाहिरातबाजीबाबत तर भाजपाचा हात कोणी पकडू शकत नाही, असे ते म्हणाले. सभागृहात २८८ सदस्य आहेत. त्यांच्यापैकी किती जणांच्या मतदारसंघात किती कोटींची गुंतवणूक मेक इन महाराष्ट्रमध्ये आली? आहेत ते उद्योग बंद पडत आहेत. बेकारी कधी नव्हे एवढी वाढली आहे. बेकारीपायी तरुण दहशतवादाकडे वळत आहे, असे ते म्हणाले. गोवंश हत्या बंदीचा निर्णय घेऊन सरकारने अनेकांना बेरोजगार केल्याची टीकाही त्यांनी केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे यावेळी काढले. (विशेष प्रतिनिधी)