शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

...तर मंत्र्यांना बायकाच बडवतील!

By admin | Updated: July 29, 2016 01:22 IST

सत्ता येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी महागाई कमी झाली का, एवढं फक्त आपल्या बायकांना विचारा. तुम्हाला तुमच्या बायकाच लाटणं घेऊन बडवतात की नाही बघा, अशा शब्दात

मुंबई : सत्ता येऊन पावणेदोन वर्षे झाली तरी महागाई कमी झाली का, एवढं फक्त आपल्या बायकांना विचारा. तुम्हाला तुमच्या बायकाच लाटणं घेऊन बडवतात की नाही बघा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत भाजपा-शिवसेनेच्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. महागाई, बेरोजगारी तसेच कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांच्या वतीने चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेला सुरुवात करताना पवारांनी हा हल्लाबोल केला. निवडणुकीच्या काळात कोणकोणती आश्वासने तुम्ही दिली होती हे आठवा. सह्याद्रीवर बसून त्यांचा आढावा घ्या. पाळलेली आश्वासने दिसत नाहीत हे पाहून तुमची झोप उडेल त्या दिवशी राज्याच्या हिताचे निर्णय होऊ लागतील, असे पवार यांनी बजावले. अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारला, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा?’ असा सवाल करावासा वाटतो. नुसती जाहिरातबाजी सुरु आहे. मोठमोठे दावे केले जात आहेत. जाहिरातबाजीबाबत तर भाजपाचा हात कोणी पकडू शकत नाही, असे ते म्हणाले. सभागृहात २८८ सदस्य आहेत. त्यांच्यापैकी किती जणांच्या मतदारसंघात किती कोटींची गुंतवणूक मेक इन महाराष्ट्रमध्ये आली? आहेत ते उद्योग बंद पडत आहेत. बेकारी कधी नव्हे एवढी वाढली आहे. बेकारीपायी तरुण दहशतवादाकडे वळत आहे, असे ते म्हणाले. गोवंश हत्या बंदीचा निर्णय घेऊन सरकारने अनेकांना बेरोजगार केल्याची टीकाही त्यांनी केली.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे यावेळी काढले. (विशेष प्रतिनिधी)