शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

संघाने घेतले मंत्र्यांचे बौद्धिक

By admin | Updated: August 24, 2015 01:41 IST

राज्यात भाजपप्रणित सरकार सत्तेवर येऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी सरकार आणि पक्ष संघटनेमध्ये पाहिजे तसा समन्वय नाही. कार्यकर्ते,

औरंगाबाद : राज्यात भाजपप्रणित सरकार सत्तेवर येऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी सरकार आणि पक्ष संघटनेमध्ये पाहिजे तसा समन्वय नाही. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना चांगली वागणूक मिळत नाही आणि कामेही केली जात नाहीत, अशा तक्रारींचा पाढा वाचत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रविवारी येथे झालेल्या समन्वय बैठकीत मंत्र्यांचे बौद्धिक घेण्यात आले. तीन केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या वेळी संघप्रणीत विविध संघटना तसेच संबंधित खात्याचे मंत्री यांच्यात आमने-सामने चर्चा घडविण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागातील कार्यकर्त्यांच्या दोनदिवसीय समन्वय बैठकीचा समारोपही यावेळी झाला. संघाचे अ. भा. कार्यवाह दत्तात्रय होसबळे, क्षेत्र संचालक जयंतीभाई देसाडिया, क्षेत्र कार्यवाह सुनील मेहता, क्षेत्र प्रचारक डॉ. रवींद्र जोशी, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक चौगुले, पूर्व सैनिक सेवा परिषदेचे लेप्ट. जन. व्ही. एन. पाटील, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे, विवेकानंद रुग्णालयाचे डॉ. अशोक कुकडे, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह अ.भा.वि.प., सामाजिक समरसता मंच, वनवासी कल्याण आश्रम, क्रीडा भारती, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ या संघप्रणीत संघटनांच्या प्रतिनिधींची बैठकीस उपस्थित होती. मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी, केंद्रीय मंत्री हे स्वयंसेवक या नात्याने बैठकीस उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे ही बैठक चर्चेची ठरली. राज्य सरकारच्या कामाविषयी गाऱ्हाणी मांडण्यासाठी मंत्र्यांना बोलावलेच नव्हते, असे प्रांत प्रचारप्रमुख वामन देशपांडे यांनी स्पष्ट केले.संघाचा दावा काही असला, तरी बैठकीमागचे कारण वेगळेच होते. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असताना संघ व संबंधित संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राज्यकर्त्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही. त्यांच्या कामांचा निपटारा वेगाने केला जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संघ व संबंधित संघटनांच्या काय अपेक्षा आहेत, याची राज्यकर्त्यांना जाणीव करून देण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. संघांशी संबंधित विविध संघटना वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करतात. संघटनानिहाय कामाचा आढावा मंत्र्यांसमोर सादर करण्यात आला. संघटनेची सद्य: स्थिती, कामात येणाऱ्या अडचणी, संघटनात्मक विस्तार, आगामी योजना यांची विस्तृत माहिती देण्यात आली.