शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री लोणीकर यांच्या मेव्हण्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या

By admin | Updated: December 6, 2015 02:04 IST

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मेव्हणे कैलास बालासाहेब खिस्ते (४५) यांनी नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून निवळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.

बोरी (जि. परभणी) : पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मेव्हणे कैलास बालासाहेब खिस्ते (४५) यांनी नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून निवळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली़जिंतूर तालुक्यातील निवळी येथील कैलास खिस्ते यांच्याकडे शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन होते. परभणी जिल्ह्यांत दोन वर्षांपासून दुष्काळाची स्थिती आहे़ त्यामुळे शेती अडचणीत आली आहे. खिस्ते यांना १५ एकर जमीन आहे़ जमीन गहाण ठेवून शेतीसाठी कर्ज घेतले होते़ शुक्रवारी खिस्ते हे नेहमीप्रमाणे घराच्या माडीवर झोपण्यासाठी गेले. शनिवारी सकाळी बराच वेळ झाला तरीही ते झोपेतून न उठल्याने घरच्या मंडळींनी माडीवर जाऊन पाहिले असता, त्यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले.सततच्या नापिकीला कंटाळून खिस्ते यांनी जीवन संपविल्याची माहिती त्यांचे भाऊ श्रीहरी खिस्ते यांनी बोरी पोलिसांना दिली़ त्यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ खिस्ते यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, चार मुली, भाऊ असा परिवार आहे़ खिस्ते यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी निवळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी बबनराव लोणीकर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)चार शेतकऱ्यांची आत्महत्या नापिकी आणि कर्जबाजारीमुळे परभणीत आणखी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा येथे भानुदास नागोराव कल्हारे व सेलू तालुक्यातील डासाळा येथील बापूराव लक्ष्मणराव बागल (४०) यांनी नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली़ रवळगाव येथील सुभाष काशीनाथ फुलपगारे (३५) यांनी कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून शनिवारी गळफास घेतला. तर वाशिम जिल्ह्यातील सावंगा जहागीर येथील शांतीराम गोदमले (३७) यांनीही गळफास घेऊन जीवन संपविले.