शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

मंत्री सुटले, अधिकारी गाळात!

By admin | Updated: June 15, 2014 02:02 IST

चितळे समितीचा अहवाल आणि त्यावरील कार्यपालन अहवाल (एटीआर) आज जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विधानसभेत सादर केला.

मुंबई - राज्यातील सिंचन घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या डॉ. माधवराव चितळे समितीच्या अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार, विद्यमान जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यासह महादेव शिवणकर, एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, डॉ. पद्मसिंह पाटील या तत्कालीन जलसंपदामंत्र्यांना ‘क्लीन चिट’ देत अधिकाऱ्यांवर मात्र ठपका ठेवण्यात आला आहे. चितळे समितीचा अहवाल आणि त्यावरील कार्यपालन अहवाल (एटीआर) आज जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील सिंचन क्षमता केवळ ०.१ टक्के इतकीच वाढली असल्याचा निष्कर्ष २०१२च्या आर्थिक पाहणी अहवालात काढण्यात आला होता. ७० हजार कोटी रुपये खर्चूनही ०.१ टक्के इतकेच सिंचन वाढल्याच्या मुद्यावरून राजकीय वादळ उठले होते़ त्यामुळे सरकारने चौकशीसाठी चितळे समिती नेमली होती. १९९६ ते २०१२ आतापर्यंत झालेल्या सिंचन प्रकल्पांवर झालेला खर्च आणि प्रत्यक्षातील काम तपासून समितीने निष्कर्ष काढला आहे. कथित सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांनी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांना धारेवर धरले होते. मात्र, समितीने पवार यांच्यासह तत्कालीन सर्व जलसंपदामंत्र्यांवर कोणताही ठपका ठेवलेला नाही. एवढेच नाही तर सिंचन क्षमता निर्मितीत २६ टक्के इतकी वाढ झाल्याचा निष्कर्षही समितीने नोंदवला आहे. सिंचन महामंडळाचे वित्त अधिकारी आणि कार्यकारी संचालकांनी प्रकल्पाच्या किमती वाढवण्यात आल्याची माहिती जलसंपदामंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळाला देऊनही त्यास मंजुरी दिली गेली, असा ठपका चितळे समितीने ठेवला आहे. हे लक्षात घेता जलसंपदामंत्री राहिलेले अजित पवार आणि इतर तत्कालीन जलसंपदामंत्र्यांवर हा ठपका आहे, असा आरोप विरोधकांनी केला. त्यावर चार प्रकल्पांबाबत असे घडले होते, पण तशी मंजुरी देण्याचे अधिकार जलसंपदामंत्री पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या नियामक मंडळाला होते, अशी भूूमिका शासनाने घेतली आहे. आर्थिक पाहणी अहवालात एकूण सिंचित क्षेत्राची तुलना सतत कमी-जास्त होणाऱ्या एकूण पीक क्षेत्राशी केल्यामुळे त्या आधारे काढलेले निष्कर्ष अयोग्य व गैरसमज पसरवणारे असण्याची शक्यता निर्माण होते, असेही समितीने म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)