शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘एमआयएम’ची नोंदणी रद्द !

By admin | Updated: July 14, 2016 04:11 IST

आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणूक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे

मुंबई : आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणूक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे. त्यामुळे या पक्षाला फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेसह कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येणार नाही. शिवाय, १९१ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांनादेखील असाच फटका बसला आहे. निवडणूक आयोगाकडे एकूण ३५९ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यात १७ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून उर्वरित सर्व ३४२ अमान्यताप्राप्त आहेत. या पक्षांना आयकर विवरणपत्र भरल्याची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे; परंतु ती सादर न केल्यामुळे ३२६ राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतरही मुदतीत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे १९१ पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आम्ही अपील दाखल करणार असल्याची माहिती एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी दिली. बुधवारी आयोगाने पक्षाची मान्यता रद्द केल्यानंतर आ. जलील यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. यामध्ये जलील यांनी नमूद केले की, आयोगाला हवी असलेली सर्व कागदपत्रे आमच्या हैदराबाद येथील टीमने सादर केली होती. त्यानंतरही पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आदर करीत पुन्हा आयोगाकडेच अपील दाखल करणार आहोत. आगामी महापालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याला आयोगाचे प्राधान्य असते. निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्या राजकीय पक्षास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी चिन्ह वाटपात प्राधान्य दिले जाते.नोंदणी रद्द केलेले राजकीय पक्षमुंबईतील २८, ठाणे/पालघरचे १५, रायगडचे ४, सिंधुदुर्ग १, नाशिकचे ८, जळगावचे १६, नंदुरबारचे २, अहमदनगरचे २०, पुण्याचे १४, सोलापूरचे ७, साताऱ्याचे ११, सांगलीचे ८, कोल्हापूरचे ७, औरंगाबादचे ७, बीडचे ३, नांदेडचे ३, जालना, लातूर २, अमरावतीचे २, अकोल्याचे २, यवतमाळचे ३, बुलडाण्याचे ५, नागपूरचे १२, वर्ध्याचे २, गोंदियाचे २ यांचा समावेश आहे.