शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

अनुदानाव्यतिरिक्त विवाह सोहळय़ांवर लाखो रुपयाची उधळण

By admin | Updated: August 11, 2015 22:46 IST

शुभमंगल सामुहिक विवाह योजनेला प्रतिष्ठेचे ग्रहण.

नीलेश शहाकार/बुलडाणा: शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतील लाभधारकांनी शासनाकडून प्राप्त होणार्‍या अनुदानाव्यतिरिक्त कपडे, दागिणे, आहेर, जेवण, पुजा, वाहन आदींवर लाखोचा खर्च केल्याचे उघड झाले आहे. या योजनेच्या स्थिती व अंमलबजावणीबाबत राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने ४ जून रोजी अहवाल तयार केला होता. हा अहवाल आता प्रसिद्ध करण्यात आला असून, यामध्ये शुभमंगल योजनेचे अनुदान घेऊनही अनेकांनी विवाह सोहळय़ांमध्ये अवास्तव खर्च केल्याचे समोर आले आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबांवर मुलीच्या विवाहाचा आर्थिक बोजा पडू नये, यासाठी राज्य शासनाने २00८ साली शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुरू केली. २0११ मध्ये या योजनेत काही सुधारणा करून सुधारित शुभमंगल सामूहिक तसेच नोंदणीकृत विवाह योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत वधू पित्याला १0 हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. अनेक पालकांना कर्ज घेऊन मुलीचे हात पिवळे करावे लागतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकूवत असणार्‍यांना या योजनेत सहभागी करण्यात आले; मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही अनेक लाभार्थ्यांनी प्रतिष्ठेच्या हव्यासातून अनुदानाव्यतिरिक्त विवाहावर लाखो रुपयंची उधळण केल्याचे चित्र आहे. कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या सहा विभागात एकूण ५४७ लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला. या योजनेतील एकूण लाभार्थ्यांपैकी ३६६ लाभधारकांनी २५ हजाराचा खर्च, तर १३५ लाभधारकांनी ५0 हजारापर्यत खर्च केला. ३५ लाभधारकांनी ५0 हजार ते १ लाखापर्यंत, तर ११ लाभार्थ्यांनी १ लाखापैक्षा जास्त वैयक्तीक खर्च या योजनेतील विवाह सोहळय़ांमध्ये केल्याचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमुद केले आहे.

*कर्ज घेऊन केले विवाह

           समारंभ योजनेत सहभागी ३६१ लाभार्थ्यांनी विवाहासाठी लागणारा अतिरिक्त खर्च स्वत:च्या उत्पन्नातून केला. १२९ लाभार्थ्यांनी नातेवाईकांकडून पैसे उसणे घेतले. ५७ लाभार्थ्यांनी लग्नासाठी सावकारांकडून कर्ज घेवून लग्नाचा अतिरिक्त खर्च भागवला. योजनेत सहभागी १६ टक्के लाभार्थ्यांनी तर मुलींच्या विवाहासाठी हुंडा दिल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.