शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

खंडित वीजपुरवठ्यामुळे कोट्यवधींचे नुकसान

By admin | Updated: July 4, 2016 02:00 IST

एमआयडीसीतील ‘टी ब्लॉक’मध्ये रविवारी सकाळी सात वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

भोसरी : एमआयडीसीतील ‘टी ब्लॉक’मध्ये रविवारी सकाळी सात वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. कामगारांना बसून पगार द्यावा लागला व उत्पादनही ठप्प झाले. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.एमआयडीसीतील टी ब्लॉकमध्ये ५०० ते ६०० युनिट आहेत. सर्वच ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्योजकांचे नुकसान झाले. सकाळी सात वाजल्यापासून महावितरणाच्या अधिकाऱ्यांना कळवूनसुद्धा सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. काम सुरू आहे, थोड्या वेळात वीज येईल, अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत होती. विद्युत महावितरणकडून दररोज एमआयडीसीतील कोणत्या ना कोणत्या भागात वीजपुरवठा खंडित केला जातो. तसेच अनेक वेळा अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनसुद्धा तीन ते चार तास वीजपुरवठ्यापासून वंचित राहावे लागते, असे आरोपही उद्योजकांनी केले. महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. एल. शिंदे म्हणाले, तांत्रिक कारणामुळे बिघाड झाली होती. वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येणार आहे. (वार्ताहर)> टी ब्लॉकमध्ये सकाळी सात वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. येथे सुमारे ६०० युनिट आहेत. उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे अधिकारी केवळ चालढकल करतात. एमआयडीसीत प्रत्येक भागात दररोज असे प्रकार घडतात. महावितरणकडून दुर्लक्ष केले जाते.- संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना