शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

लक्षावधी डोळ्यांनी अनुभवला रिंगण सोहळा!

By admin | Updated: June 30, 2017 01:29 IST

ज्ञानोबा माऊलीच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा गुरुवारी दुपारी पुरंदावडे येथे पार पडला. माऊलींच्या अश्वांनी

गोपालकृष्ण मांडवकर । लोकमत न्यूज नेटवर्क पुरंदावडे (जि. सोलापूर) : ज्ञानोबा माऊलीच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा गुरुवारी दुपारी पुरंदावडे येथे पार पडला. माऊलींच्या अश्वांनी दोन रिंगण पूर्ण करताच लक्षावधींच्या मुखातून ‘माऊली.... माऊली....’ असा जयघोष उमटला. अश्वांच्या खुरांनी पुनित झालेली माती कपाळी लावण्यासाठी उडालेली झुंबड, त्यानंतर पालखीपुढे तब्बल अर्धा तास रंगलेल्या दिंडीच्या उडी सोहळ्यातून निर्माण झालेल्या ब्रह्मनादाने संपूर्ण वातावरणच भारावून गेले.अगदी सव्वा वाजता माऊलींची पालखी सदाशिवनगरजवळ असलेल्या पुरंदावडे येथे पोहोचली. विस्तीर्ण मैदान आधीच लक्षावधींच्या जनसागराने फुलून गेले होते. माऊलींच्या अश्वांनी रिंगण सोहळ्यातील सजविलेल्या मैदानात प्रवेश केला. त्या पाठोपाठ माऊलींच्या गजरात ज्ञानोबारायांची पालखी प्रवेशली आणि सजविलेल्या मंडपातील आसनावर विराजमान झाली.चोपदारांनी संपूर्ण तयारीची खात्री केली. स्वाराच्या आणि माऊलींच्या अश्वाला पालखीजवळ आणले. त्यानंतर बरोबर दोनच्या ठोक्याला हा नेत्रदीपक रिंगण सोहळा सुरू झाला. रांगोळ्यांनी सजविलेल्या रिंगणातील मार्गावरून आधी स्वाराचा अश्व दौडत निघाला. त्याच्या अगदी मागे माऊलींचा अश्व चौखुर उधळीत निघाला. पहिल्या रिंगणापाठोपाठ दुसरे रिंगण या अश्वांनी विद्युत वेगाने पूर्ण केले. माऊलींच्या पालखी पुढे येऊन अश्व थांबताच रिंगण पूर्ण झाल्याची घोषणा चोपदारांनी केली. स्वारामागे असलेल्या पांढऱ्या शुभ्र अश्वावर माऊली विराजमान असते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी अश्वांच्या टाचांनी पुनित झालेली माती उचलण्यासाठी भाविकांनी धाव घेतली.शहाजी फुरडे-पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क अकलूज :उंच पताका झळकती टाळ मृदंग वाजती प्रेमे आनंदी नाचती भद्र जाती विठ्ठलाचे आले हरीचे विनटवीर विठ्ठलाचे सुभट मेणे झाले दिक्पट पळती घाट दोषांचे’अखंडपणे सुरू असलेला विठू नामाचा गजर... ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष...टाळ मृदंगाच्या आवाजाने सर्वत्र तयार झालेले भक्तीमय वातावरण अशा उत्साही वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यातील पाहिले गोल रिंगण गुरुवारी दुपारी अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पार पडले.आज सकाळी ८़३० वाजता नीरा नदी ओलांडून पालखी सोहळ्याचे अकलूज नगरीत आगमन झाले. जुन्या अकलूजमध्ये पालखी सोहळ्याने प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर सकाळी १० नंतर दिंड्या माने विद्यालयात येऊ लागल्या. मैदानाच्या मध्यभागी उभारलेल्या भव्य शामियान्यात पालखी स्थानापन्न झाली. त्यानंतर खा़ विजयसिंह मोहिते-पाटील आणि नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले. रिंगणानंतर ‘भाग गेला, शीण गेला अवघा झाला आनंद’ या अभंगाप्रमाणे वारकऱ्यांनी फुगडी, मनोरे आदी खेळांचा आनंद घेतला. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर लगेच समाज आरती घेण्यात आली.