शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

लक्षावधी डोळ्यांनी अनुभवला रिंगण सोहळा!

By admin | Updated: June 30, 2017 01:29 IST

ज्ञानोबा माऊलीच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा गुरुवारी दुपारी पुरंदावडे येथे पार पडला. माऊलींच्या अश्वांनी

गोपालकृष्ण मांडवकर । लोकमत न्यूज नेटवर्क पुरंदावडे (जि. सोलापूर) : ज्ञानोबा माऊलीच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा गुरुवारी दुपारी पुरंदावडे येथे पार पडला. माऊलींच्या अश्वांनी दोन रिंगण पूर्ण करताच लक्षावधींच्या मुखातून ‘माऊली.... माऊली....’ असा जयघोष उमटला. अश्वांच्या खुरांनी पुनित झालेली माती कपाळी लावण्यासाठी उडालेली झुंबड, त्यानंतर पालखीपुढे तब्बल अर्धा तास रंगलेल्या दिंडीच्या उडी सोहळ्यातून निर्माण झालेल्या ब्रह्मनादाने संपूर्ण वातावरणच भारावून गेले.अगदी सव्वा वाजता माऊलींची पालखी सदाशिवनगरजवळ असलेल्या पुरंदावडे येथे पोहोचली. विस्तीर्ण मैदान आधीच लक्षावधींच्या जनसागराने फुलून गेले होते. माऊलींच्या अश्वांनी रिंगण सोहळ्यातील सजविलेल्या मैदानात प्रवेश केला. त्या पाठोपाठ माऊलींच्या गजरात ज्ञानोबारायांची पालखी प्रवेशली आणि सजविलेल्या मंडपातील आसनावर विराजमान झाली.चोपदारांनी संपूर्ण तयारीची खात्री केली. स्वाराच्या आणि माऊलींच्या अश्वाला पालखीजवळ आणले. त्यानंतर बरोबर दोनच्या ठोक्याला हा नेत्रदीपक रिंगण सोहळा सुरू झाला. रांगोळ्यांनी सजविलेल्या रिंगणातील मार्गावरून आधी स्वाराचा अश्व दौडत निघाला. त्याच्या अगदी मागे माऊलींचा अश्व चौखुर उधळीत निघाला. पहिल्या रिंगणापाठोपाठ दुसरे रिंगण या अश्वांनी विद्युत वेगाने पूर्ण केले. माऊलींच्या पालखी पुढे येऊन अश्व थांबताच रिंगण पूर्ण झाल्याची घोषणा चोपदारांनी केली. स्वारामागे असलेल्या पांढऱ्या शुभ्र अश्वावर माऊली विराजमान असते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी अश्वांच्या टाचांनी पुनित झालेली माती उचलण्यासाठी भाविकांनी धाव घेतली.शहाजी फुरडे-पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क अकलूज :उंच पताका झळकती टाळ मृदंग वाजती प्रेमे आनंदी नाचती भद्र जाती विठ्ठलाचे आले हरीचे विनटवीर विठ्ठलाचे सुभट मेणे झाले दिक्पट पळती घाट दोषांचे’अखंडपणे सुरू असलेला विठू नामाचा गजर... ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष...टाळ मृदंगाच्या आवाजाने सर्वत्र तयार झालेले भक्तीमय वातावरण अशा उत्साही वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यातील पाहिले गोल रिंगण गुरुवारी दुपारी अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पार पडले.आज सकाळी ८़३० वाजता नीरा नदी ओलांडून पालखी सोहळ्याचे अकलूज नगरीत आगमन झाले. जुन्या अकलूजमध्ये पालखी सोहळ्याने प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर सकाळी १० नंतर दिंड्या माने विद्यालयात येऊ लागल्या. मैदानाच्या मध्यभागी उभारलेल्या भव्य शामियान्यात पालखी स्थानापन्न झाली. त्यानंतर खा़ विजयसिंह मोहिते-पाटील आणि नंदिनीदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले. रिंगणानंतर ‘भाग गेला, शीण गेला अवघा झाला आनंद’ या अभंगाप्रमाणे वारकऱ्यांनी फुगडी, मनोरे आदी खेळांचा आनंद घेतला. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर लगेच समाज आरती घेण्यात आली.