शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सैन्य भरती घोटाळा; कारवाईसाठी घेणार विधिज्ञांचा सल्ला

By admin | Updated: March 16, 2017 03:58 IST

सैन्य भरती घोटाळ्यामध्ये अडकलेल्या ३५० विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत ठाणे पोलीस विधिज्ञांचा सल्ला घेण्याच्या विचारात आहे

ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यामध्ये अडकलेल्या ३५० विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत ठाणे पोलीस विधिज्ञांचा सल्ला घेण्याच्या विचारात आहे. विधिज्ञ या प्रकरणी काय सल्ला देतात, यावरच या विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.२६ फेब्रुवारी रोजी ४ पदांसाठी सैन्य भरती मंडळातर्फे देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तत्पूर्वी, २५ फेब्रुवारी रोजी रात्री ठाणे पोलिसांनी पुणे, नागपूर आणि गोव्यात धाडी टाकून प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला. तिन्ही ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये एकूण ३५० विद्यार्थी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी धाड टाकली, तेव्हा आरोपींनी फोडलेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव हे विद्यार्थी करीत होते. तूर्तास सर्व विद्यार्थ्यांचे जाबजबाब नोंदवून पोलिसांनी त्यांना सोडले आहे. परंतु, आता या प्रकरणाचा तपास वेगात सुरू असताना त्या विद्यार्थ्यांचे काय करावे, असा पेच पोलिसांना पडला आहे. प्रश्नपत्रिकेच्या मोबदल्यात आरोपींनी विद्यार्थ्यांशी कोणतेही आर्थिक व्यवहार केले नव्हते. त्यांची मूळ प्रमाणपत्रे मात्र आरोपींनी स्वत:च्या ताब्यात घेतली होती. अंतिम निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ठरलेली रक्कम द्यायची आणि मूळ प्रमाणपत्रे आरोपींकडून परत घ्यायची, असा हा सौदा होता. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आरोपी करावे अथवा नाही, असा पेच पोलिसांसमोर पडला आहे. कायद्याच्या चौकटीतून विचार केला तर हे विद्यार्थी पीडित शब्दाच्या व्याख्येत बसत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर विधितज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधिज्ञांनी विद्यार्थ्यांनाही आरोपी करण्याचे मत नोंदवल्यास पोलिसांसमोर पर्याय राहणार नाही. या प्रकरणातील बहुतांश विद्यार्थी आजीमाजी सैनिकांच्या कुटुंबातील आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीही जेमतेमच आहे. नोकरी करून कुटुंबाला हातभार लावण्याचे त्यांचे स्वप्न गत महिन्यातील भरतीवेळी पूर्ण होऊ शकले नाही. आता फौजदारी कारवाईचा ससेमिरा मागे लागला, तर त्यांचे नोकरीचे स्वप्न कदाचित कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. (प्रतिनिधी)