शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

मेट्रो रेल्वेही महागली!

By admin | Updated: January 9, 2015 02:29 IST

रिक्षा तसेच टॅक्सीची सातत्याने होणारी भाडेवाढ यामुळे अगोदरच वैतागलेल्या मुंबईकरांसाठी आता औत्सुक्याची आणि तेवढीच सोयीची असलेली मुंबई मेट्रोही महागली आहे.

सरकारी उदासीनतेचा फटका : हायकोर्टानेही कान उपटलेमुंबई : लोकल प्रवास, बेस्ट बसद्वारे होणारा प्रवास आणि रिक्षा तसेच टॅक्सीची सातत्याने होणारी भाडेवाढ यामुळे अगोदरच वैतागलेल्या मुंबईकरांसाठी आता औत्सुक्याची आणि तेवढीच सोयीची असलेली मुंबई मेट्रोही महागली आहे. भाडेवाढीसाठी गुरुवारी उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला. त्यामुळे सध्या मेट्रोचे प्रवास भाडे १०, १५ व २० रुपये असून, आता ते १०, २०, ३० व ४० रुपये एवढे होणार आहे. मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. गेल्या वर्षी आदेश देऊनही केंद्र सरकारने हे प्रवास भाडे निश्चित करण्यासाठी समिती नेमली नाही. हे दुर्दैव आहे, असे खडेबोलही न्यायालयाने या वेळी सुनावले. येत्या ३१ जानेवारीपर्यंत सरकारने ही समिती स्थापन करावी व त्यानंतर तीन महिन्यांत समितीने याचे दर निश्चित करावेत. समितीने हे दर निश्चित करताना प्रवाशांच्या हिताचा विचार करावा, असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे असल्याने यास स्थगिती द्यावी, अशी विनंती एमएमआरडीएने केली. न्यायालयाने ती फेटाळून लावली. मेट्रोचे प्रवास भाडे वाढवणार असल्याचे रिलायन्सने जाहीर केल्यानंतर याविरोधात एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली. करारानुसार रिलायन्स ही दरवाढ करू शकत नसल्याचा दावा एमएमआरडीएने केला होता. तसेच हे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याची विनंतीही एमएमआरडीएने केली होती. एका न्यायाधीशांच्या खंडपीठाने एमएमआरडीएची ही मागणी फेटाळली. याला एमएमआरडीएने मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर आव्हान दिले होते. (प्रतिनिधी)वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४ कि.मी. लांबीच्या मेट्रो कॉरिडॉरमधील विविध अंतराच्या भाडेवाढीबाबत चर्चा करण्यासाठी ३१ जानेवारी २०१५पर्यंत मेट्रो रेल्वे निर्धारित समितीची स्थापना करण्यात यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या निर्णयाबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून या निर्णयावर वरील न्यायालयात अपील करायचे किंवा कसे याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.