शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मेट्रो तिकीट महागणार, दरवाढ विरोधातील याचिका फेटाळली

By admin | Updated: June 24, 2014 18:15 IST

मेट्रो ट्रेनच्या तिकीट दरवाढीविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने ८ जुलैपासून नवे दर लागू होणार आहेत.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २४ - मेट्रो ट्रेनच्या तिकीट दरवाढीविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने ८ जुलैपासून नवे दर लागू होणार आहेत. मेट्रो तिकीटाचे दर वाढवू नयेत यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र मंगळवारी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत भाडेवाढीला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे रिलायन्सच्या पत्रकानुसार मेट्रोचे किमान भाडे १० रुपये तर कमाल भाडे ४० रुपये इतके असेल. ८ जुलैपासून हे नवे दर लागू होतील. 
मेट्रोच्या तिकीट दरावरून ब-याच काळापासून राज्य सरकार व रिलायन्समध्ये वादावादी सुरू होती. मेट्रोचे किमान भाडे ९ रुपये व कमाल भाडे १३ रुपये असा दर सरकारने निश्चित केला होता. मात्र मेट्रो प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे काण पुढे करत हे दर १०,२०,३० व ४० रुपये असे ठेवण्यावर रिलायन्स ठाम होती. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती, सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिका फेटाळल्याने आता नवे दर लागू होतील. ८ जून रोजी मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर रिलायन्सने एका महिन्याभरासाठी तिकीट १० रुपये इतके ठेवले होते, त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवा प्रवासासाठी अवघे १० रुपयेच मोजावे लागत होते.
मात्र आता न्यायालयाच्या निर्णयानंतर ८ जुलैपासून नवे दर लागू होतील व मेट्रोतून प्रवास करणा-यांच्या खिशालाही कात्री लागणार आहे.