शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अमृता फडणवीस यांचा ‘विविधतेतून एकते’चा संदेश

By admin | Updated: February 6, 2017 00:52 IST

सगळ्या जगात हिंसाचार, द्वेष पसरलेला असताना विविधतेतून एकता हा छान संदेश फक्त भारतातून जगाला दिला जाऊ शकतो.

मुंबई : सगळ्या जगात हिंसाचार, द्वेष पसरलेला असताना विविधतेतून एकता हा छान संदेश फक्त भारतातून जगाला दिला जाऊ शकतो. आणि हा संदेश गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये नॅशनल प्रेयर ब्रेकफास्ट फॉर वर्ल्ड पीसमध्ये अ‍ॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस यांनी दिला. जगात या कार्यक्रमाला मोठी प्रतिष्ठा आहे. अमृता फडणवीस या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. या कार्यक्रमाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘‘भारताची संस्कृती महान आणि व्यापक आहे. २९ राज्ये, २२ भाषा, १६०० बोलीभाषा अशी विविधतेत एकता आहे. आम्ही दिवाळी, ईद, ख्रिसमस एकाच उत्साहात साजरा करतो. येत्या पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी एकीने राहण्याची गरज आहे.’’ अमृता फडणवीस यांनी स्त्री-पुरुष भेद मिटविण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, ‘‘मी एक आई तसेच आम्ही सगळ्या आया या आपल्या मुलांच्या कल्याणात आनंद शोधत असतो. चांगले जग निर्माण व्हायला हवे; कारण आज जगात ४० टक्के मुलींना शाळेतच जायला मिळत नाही आणि ७० टक्के महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावे लागते.’’ मन:शांती आणि आनंद प्राप्त करायचा असल्यास मानवतेच्या कल्याणासाठी नि:स्वार्थ भावनेने सगळ्यांनी काम केले पाहिजे, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले. फडणवीस शेतकऱ्यांबद्दल बोलल्या. त्या म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रात आजही ५० टक्क्यांपेक्षा जास्त खेडी दुष्काळाला तोंड देत आहेत.’’ या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षस्थानी होते. फडणवीस यांनी आपल्या भाषणाचा शेवट भारताच्या पाच हजार वर्षांच्या समृद्ध वारसा व परंपरेचा उल्लेख करून केला. या कार्यक्रमात फडणवीस यांनी अमेरिकेचे सिनेटर्स आणि सलोखा व शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी जगातून आलेले वेगवेगळ्या देशांचे नेते यांच्याशी चर्चा केली. त्या म्हणाल्या, ‘प्रेमाची शक्ती’ अशा या कार्यक्रमात बोलायची विशेष संधी मला मिळाली आणि मी माझे भाषण जय हिंद, जय भारत म्हणून संपवले. अध्यक्ष ट्रम्प यांचे भाषण ऐकणे हा आनंद होता.’’