शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

मेळघाट व्याघ्र प्रकल्प राज्यात अव्वल

By admin | Updated: November 13, 2015 00:41 IST

केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रबंध, कौशल्य व मूल्यमापनात सरस असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.

गणेश वासनिक, अमरावतीकेंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रबंध, कौशल्य व मूल्यमापनात सरस असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. परिणामी राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाटला अव्वल दर्जा प्रदान करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या प्रकल्पात ६५ वाघ असल्याची नोंद देखील करण्यात आली आहे.२०१२ ते २०१४ या वर्षांत या प्रकल्पात वाघांचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. त्यानुसार या चार वर्षांत पूर्णपणे वाढ झालेले ४२ तर २३ बछड्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. अत्यंत सूक्ष्म आणि काटेकोर अभ्यासाअंती सहा वाघिणींनी १४ बछड्यांना जन्म दिला असून हे सर्व बछडे जीवंत असल्याचे कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये कैद झाले आहे. मेळघाटचे जंगल दऱ्या-खोऱ्यांनी युक्त असल्यामुळे वाघांचे संरक्षण आणि संगोपनासाठी पोषक आहे. प्रकल्पातील वाघिणींची प्रजननक्षमता दोन ते तीन असल्याचे महत्वपूर्ण मानले जात आहे. वाघिणीने केवळ ४० टक्के बछड्यांचे संगोपन होते, हा आजतागायतचा अनुभव आहे. मात्र, मेळघाटात ६ वाघिणींचे १४ बछडे सुरक्षित असणे हे देशातील पहिले उदाहरण मानले जात आहे. दुसरीकडे प्रकल्पाने वाघांचे संगोपन आणि संरक्षणासाठी सूक्ष्म नियोजन करुन वेगळा पायंडा रचला आहे. वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य स्थळी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघांच्या सर्व हालचाली सहजतेने टिपता येतात. वाघिणीने बछड्यांना जन्म दिल्यानंतर तिचे आश्रयस्थळ, शिकारीचा वेळ, बछड्यांच्या हालचाली या कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाघिणीसह बछड्यांचे संगोपन, संरक्षण करणे व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुकर झाले.२०१४ साली दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था यांनी या प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी यांना उत्कृष्ट प्रबंध, कौशल्य व मूल्यमापनासाठी राज्यात अव्वल असल्याबाबत पुरस्कार देवून गौरविले आहे. या दोन्ही संस्थांनी केलेल्या चाचणीत प्रकल्पाने राज्यात अव्वल तर देशात सहाव्या क्रमांकाचा नावलौकिक प्राप्त केला आहे. मेळघाटात सुमारे ६५ वाघांची नोंद होणे, ही बाब निश्चितच आनंददायी मानली जात आहे.शासन, प्रशासनस्तरावर वाघ वाचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे हे यशस्वी पाऊल मानले जात आहे.