शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

खासदार बैठकीची ‘ती’ प्रथा खंडित!

By admin | Updated: February 23, 2016 01:11 IST

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसमवेत होणाऱ्या बैठकीची प्रथा यंदा प्रथमच खंडित झाली असून राज्यातील प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना गांभिर्य

मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसमवेत होणाऱ्या बैठकीची प्रथा यंदा प्रथमच खंडित झाली असून राज्यातील प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना गांभिर्य नसल्याने त्यांनी ही बैठक टाळली, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अधिवेशनात खासदारांनी आपल्या राज्याशी संबंधित कुठले मुद्दे मांडावेत यावर विचारविनिमय करण्याकरता मुख्यमंत्री दरवर्षी अधिवेशनापूर्वी खासदारांसमवेत बैठक घेतात. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना या बैठकीला बोलविले जाते. राज्याचे कोणते विषय, मागण्या केंद्राकडे प्रलंबित आहेत या बाबतही खासदारांना माहिती दिली जाते. केंद्राकडे प्रलंबित असलेल्या मुद्यांची विशेष पुस्तिकाही खासदारांना दिली जाते. खासदार व राज्य शासन यांच्यातील समन्वयाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची असते. गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली ही प्रथा आहे. मात्र,यंदा ही बैठकच झाली नाही. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अधिवेशनापूर्वी अशी बैठक घेण्याची प्रथा आहे. त्यातून राज्याशी संबंधित विषयांचा पाठपुरावा केला जातो. मात्र मुख्यमंत्र्यांना गांभिर्य नसल्यानेच त्यांनी ही बैठक टाळली असावी. याबाबत काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी विचारणा केली असता ‘राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे ४२ खासदार आहेत आणि ते आम्हाला नेहमीच भेटत असतात. त्यामुळे बैठकीची गरज नाही, असे त्यांना सांगण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. शिवसेनेच्या काही खासदारांनीही ही बैठक न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्री कार्यालयाने केला खुलासा काही अपरिहार्य कारणामुळे ही बैठक घेता येता आली नाही. मात्र, केंद्राकडे प्रलंबित असलेल्या विषयांची विस्तृत अशी पुस्तिका राज्यातील सर्वपक्षीय खासदारांकडे पाठविण्यात आली आहे. या प्रलंबित मुद्यांचा राज्य सरकार सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा करीत असते, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला.