शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

नेवाळीप्रकरणी केंद्रातील बैठक बारगळली

By admin | Updated: June 30, 2017 02:40 IST

नेवाळी आंदोलनाप्रकरणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी बोलावलेली बैठक झालीच नाही. त्यामुळे नेवाळीप्रकरणी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळी आंदोलनाप्रकरणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी बोलावलेली बैठक झालीच नाही. त्यामुळे नेवाळीप्रकरणी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. नेवाळी विमानतळासाठी घेतलेली जागा परत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या जागेवर संरक्षण खात्याचा ताबा असून, ती त्यांच्याच नावावर आहे. जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यामुळे नौदलाकडून बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीला भामरे यांनी आंदोलनानंतर त्याच दिवशी स्थगिती दिली होती.या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीवर शेतकऱ्यांची व जमीन बचाव आंदोलन समितीची मदार होती. मात्र, ही बैठक झालीच नाही. ती बैठक भामरे यांनी रद्द केलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ही बैठक केंद्रीय संक्षरणमंत्री अरुण जेटली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणे अपेक्षित होते. देशात जीएसटी कर लागू होत आहे. त्यामुळे जेटली त्यात व्यस्त आहेत. जेटली व मुख्यमंत्री नसल्याने या बैठकीतून काही साध्य होणार की नाही, याविषयी शेतकऱ्यांना साशंकता होती. त्यामुळे गुरुवारी बैठकच होऊ शकली नाही, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. परिणामी, कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. पेट्रोल मिळाले कुठून?नेवाळीच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी व जमीन बचाव आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली. त्यासाठी त्यांना पेट्रोल कुठून मिळाले. कोणत्या पंपातून नेवाळी परिसरात बाटलीतून खुली विक्री केली जाते, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. या वेळी पेट्रोबॉम्बचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे. पेट्रोबॉम्ब टाकून वाहने जाळण्यात आली, असे सांगितले जात असले तरी हा बॉम्ब तयार करण्याची माहिती ग्रामस्थांना नाही. या परिसरातील चाळीत राहणाऱ्या उत्तर भारतीय भाडेकरूंनी हे बॉम्ब तयार केले असावेत. त्याचा या आंदोलनात वापर झाला असल्याचा अंदाज आहे.शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६ जुलैला ‘चलो डोंबिवली’-१शेतजमिनी परत मिळाव्यात, यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार व गोळीबार केला. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याला पोलीसच जबाबदार असल्याने या आंदोलनाचे समर्थन करणे योग्य होणार नाही. मात्र, नेवाळीतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आगरी, कोळी आणि कुणबी समाजाने ६ जुलैला ‘चलो डोंबिवली’ची हाक दिली आहे. २नेवाळीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ६ जुलैला या समाजाची बैठक सावित्रीबाई फुले कलामंदिरात दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यात आगरी, कोळी, कुणबी समाजातील डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिक, शिक्षक विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. भूमिपुत्रांच्या जमिनी सरकारने विकास प्रकल्प राबवण्यासाठी घेतल्या. समाज संघटित नसल्याने त्याच्या गैरफायदा सरकारी यंत्रणांनी घेतला आहे. राजकीय पक्ष केवळ निवडणुकीपुरतेच या समाजांना वापरत आहेत. त्यांच्यावर अन्याय झाल्यास पक्षाकडून त्यांना मदतीचा हात मिळत नाही.३नेवाळीतील शेतकऱ्यांनी जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी मोर्चा काढला होता. पोलिसांनी शेतकऱ्यांवर पॅलेट गनने गोळीबार केला. तसेच त्यांना मारहाण केली. त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा करणे, दंगल माजवणे, स्फोटक पदार्थ बाळगून जाळपोळ करणे, विनयभंग करणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यांची धरपकड सुरू केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेवाळीतील आंदोलनकर्ते शेतकरी यांना मदतीसह मार्गदर्शन करण्याकरिता ही बैठक होत आहे. नेवाळीत मोठा बंदोबस्तपोलिसांनी आतापर्यंत ३२ जणांना अटक केली आहे. ६७ जणांविरोधात नावानिशी गुन्हे दाखल केले आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन सुरूच ठेवले आहे. नेवाळीनाक्यावर पोलिसांच्या १० व्हॅन, दंगलविरोधी पथकाची एक गाडी तैनात तसेच बराच बंदोबस्त नेवाळी पोलीस चौकीजवळ आहे.