शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

नेवाळीप्रकरणी केंद्रातील बैठक बारगळली

By admin | Updated: June 30, 2017 02:40 IST

नेवाळी आंदोलनाप्रकरणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी बोलावलेली बैठक झालीच नाही. त्यामुळे नेवाळीप्रकरणी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळी आंदोलनाप्रकरणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी बोलावलेली बैठक झालीच नाही. त्यामुळे नेवाळीप्रकरणी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. नेवाळी विमानतळासाठी घेतलेली जागा परत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या जागेवर संरक्षण खात्याचा ताबा असून, ती त्यांच्याच नावावर आहे. जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यामुळे नौदलाकडून बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीला भामरे यांनी आंदोलनानंतर त्याच दिवशी स्थगिती दिली होती.या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीवर शेतकऱ्यांची व जमीन बचाव आंदोलन समितीची मदार होती. मात्र, ही बैठक झालीच नाही. ती बैठक भामरे यांनी रद्द केलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ही बैठक केंद्रीय संक्षरणमंत्री अरुण जेटली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणे अपेक्षित होते. देशात जीएसटी कर लागू होत आहे. त्यामुळे जेटली त्यात व्यस्त आहेत. जेटली व मुख्यमंत्री नसल्याने या बैठकीतून काही साध्य होणार की नाही, याविषयी शेतकऱ्यांना साशंकता होती. त्यामुळे गुरुवारी बैठकच होऊ शकली नाही, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. परिणामी, कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. पेट्रोल मिळाले कुठून?नेवाळीच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी व जमीन बचाव आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली. त्यासाठी त्यांना पेट्रोल कुठून मिळाले. कोणत्या पंपातून नेवाळी परिसरात बाटलीतून खुली विक्री केली जाते, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. या वेळी पेट्रोबॉम्बचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे. पेट्रोबॉम्ब टाकून वाहने जाळण्यात आली, असे सांगितले जात असले तरी हा बॉम्ब तयार करण्याची माहिती ग्रामस्थांना नाही. या परिसरातील चाळीत राहणाऱ्या उत्तर भारतीय भाडेकरूंनी हे बॉम्ब तयार केले असावेत. त्याचा या आंदोलनात वापर झाला असल्याचा अंदाज आहे.शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६ जुलैला ‘चलो डोंबिवली’-१शेतजमिनी परत मिळाव्यात, यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार व गोळीबार केला. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याला पोलीसच जबाबदार असल्याने या आंदोलनाचे समर्थन करणे योग्य होणार नाही. मात्र, नेवाळीतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आगरी, कोळी आणि कुणबी समाजाने ६ जुलैला ‘चलो डोंबिवली’ची हाक दिली आहे. २नेवाळीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ६ जुलैला या समाजाची बैठक सावित्रीबाई फुले कलामंदिरात दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यात आगरी, कोळी, कुणबी समाजातील डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिक, शिक्षक विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. भूमिपुत्रांच्या जमिनी सरकारने विकास प्रकल्प राबवण्यासाठी घेतल्या. समाज संघटित नसल्याने त्याच्या गैरफायदा सरकारी यंत्रणांनी घेतला आहे. राजकीय पक्ष केवळ निवडणुकीपुरतेच या समाजांना वापरत आहेत. त्यांच्यावर अन्याय झाल्यास पक्षाकडून त्यांना मदतीचा हात मिळत नाही.३नेवाळीतील शेतकऱ्यांनी जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी मोर्चा काढला होता. पोलिसांनी शेतकऱ्यांवर पॅलेट गनने गोळीबार केला. तसेच त्यांना मारहाण केली. त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा करणे, दंगल माजवणे, स्फोटक पदार्थ बाळगून जाळपोळ करणे, विनयभंग करणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यांची धरपकड सुरू केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेवाळीतील आंदोलनकर्ते शेतकरी यांना मदतीसह मार्गदर्शन करण्याकरिता ही बैठक होत आहे. नेवाळीत मोठा बंदोबस्तपोलिसांनी आतापर्यंत ३२ जणांना अटक केली आहे. ६७ जणांविरोधात नावानिशी गुन्हे दाखल केले आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन सुरूच ठेवले आहे. नेवाळीनाक्यावर पोलिसांच्या १० व्हॅन, दंगलविरोधी पथकाची एक गाडी तैनात तसेच बराच बंदोबस्त नेवाळी पोलीस चौकीजवळ आहे.