शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
4
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
5
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
6
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
7
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
8
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
9
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
10
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
11
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
12
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
13
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
14
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
15
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
16
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
17
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
18
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
19
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
20
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी

वैद्यकीय शिक्षणप्रक्रिया सुलभ व्हावी

By admin | Updated: June 27, 2016 01:01 IST

शिक्षण घेण्यासाठी असणारी प्रवेशप्रक्रिया आणि त्याबाबत सुरू असणारा वाद ही सध्या आपल्या राज्यातील सर्वांत मोठी समस्या झाली

पुणे : वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी असणारी प्रवेशप्रक्रिया आणि त्याबाबत सुरू असणारा वाद ही सध्या आपल्या राज्यातील सर्वांत मोठी समस्या झाली आहे. ही प्रक्रिया सुलभ आणि कायम करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केले. फेडरेशन आॅफ आॅब्स्टेट्रीक अँड गायनालॉजिकल सोसायटीज आॅफ इंडिया (एफओजीएसआय) आणि इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ गायनालॉजिकल अँड आॅब्स्टेट्रीक (एफआयजीओ)च्या परिषदेत चव्हाण बोलत होते. बेस्ट प्रॅक्टिसेस, ब्रेकथ्रूज अँड करंट डिलेमाज इन आॅब्स्टेट्रीक अँड गायनालॉजी हा परिषदेचा विषय आहे.‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा, सिम्बायोसिस विश्व विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित होते. याबरोबरच फिगोचे अध्यक्ष सी. एन. पुरंदरे आणि फॉग्सीच्या अध्यक्ष डॉ. अलका कृपलानी, फॉग्सीच्या उपाध्यक्ष आणि परिषदेच्या अध्यक्ष डॉ. भारती ढोरे-पाटील आणि पीओजीएसचे अध्यक्ष डॉ. चारुचंद्र जोशी, डॉ. सुनीता तांदुळवाडकर, डॉ. हेमा दिवाकर, डॉ. महेश गुप्ता, पंकज सरोदे व डॉ. शांताकुमारी व अभिनेत्री ईशा कोप्पीकर उपस्थित होते. ‘‘आजही आपल्या समाजातील ग्रामीण तसेच दुर्गम भागात राहणारे नागरिक आरोग्याच्या सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना योग्य त्या सेवा मिळायला हव्यात,’’ असे दर्डा यांनी सांगितले. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण काम माध्यमांनी करायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एमक्यूआर फार्मास्युटिकलचे सतीश मेहता यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. चारुचंद्र जोशी यांनी प्रास्ताविक तर डॉ. भारती ढोरे-पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>नैतिकता योग्य पद्धतीने जपली जावी : विजय दर्डामाध्यमांची वैद्यकीय जनजागृतीमध्ये असणारी भूमिका स्पष्ट करताना खासदार विजय दर्डा म्हणाले, ‘‘माध्यमांमध्ये मोठी ताकद असून, तिचा योग्य पद्धतीने वापर होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढत असताना वैद्यकीय क्षेत्रात असणारी नैतिकता योग्य पद्धतीने जपली जाणे महत्त्वाचे आहे. व्यवसाय म्हणून वैद्यकीय पेशाकडे पाहणारा वर्ग तसेच गुन्हेगार म्हणून डॉक्टरांची निर्माण होणारी ओळख ही खेदाची बाब आहे. काही वेळा गरज नसतानाही डॉक्टरांकडून काही तपासण्या करण्यास सांगितले जाते. तसेच अत्यवस्थ रुग्णाला काही दिवस विनाकारण रुग्णालयात ठेवले जाते. या गोष्टी चुकीच्या आहेत.’’ जगातील सर्वात मोठी वैद्यकीय शिक्षणाची सुविधा भारतात असून, अत्यंत तज्ज्ञ आणि निष्णात डॉक्टर भारतात तयार होतात. पूर्वी भारतात असलेली फॅमिली डॉक्टर ही अतिशय उत्तम संकल्पना होती. मात्र, आता ही संकल्पना लोप पावत चालली आहे. सध्या कोणत्याही आजारासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे, हे तितके योग्य नाही.- डॉ. शां. ब. मुजुमदार