शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

मीडियाने स्वत:च लक्ष्मणरेषा आखून घ्यावी - विजय दर्डा

By admin | Updated: September 19, 2016 11:43 IST

पत्रकारिता क्षेत्रात स्पर्धा असावी मात्र ती निकोप असायला हवी, असे प्रतिपादन लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केले.

मुंबई- पत्रकारांना पुरस्कार मिळणे ही दुर्मीळ गोष्ट आहे. त्यात या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल जाएंट्सविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आनंदाने त्याचा स्वीकार करतो. पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत जबाबदारीने काम करावे लागते. या पुरस्कारामुळे ही जबाबदारी अधिकच वाढली याची मला जाणीव आहे. विशेषत: सध्याच्या राजकीय परिस्थितीत पत्रकारांना काम करणे अधिक आव्हानात्मक आहे. गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेतील व्यावहारिकता अधिक वाढते आहे, या व्यावहारिकतेला पत्रकारांनी आणि वृत्तपत्रांनी वेळीच विरोध केला पाहिजे. व्यावसायिकता वाढीवर सरकारने अंकुश लावण्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी आपणच दक्ष राहिले पाहिजे. पत्रकारिता क्षेत्रात स्पर्धा असावी मात्र ती निकोप असायला हवी, असे प्रतिपादन लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केले.जाएंट्स इंटरनॅशनलतर्फे आयोजित ४४ व्या जाएंट्स पुरस्कार सोहळ्यात पत्रकारितेच्या क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल विजय दर्डा यांना प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना दर्डा म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली होती.त्यांनी या खात्याला नवी दिशा देण्याचे प्रयत्न केले होते. आता केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे रुपडे पालटण्याचे काम प्रकाश जावडेकर करीत आहेत. या खात्याचे जे भगवेकरण झाले होते ते बदलण्याचे काम जावडेकर यांनी केले आहे. यापूर्वी पर्यावरण खातेही त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हाताळले आहे, असे गौरवोद्गारही दर्डा यांनी काढले. दिशाहीन होत चाललेला केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचा कारभार जावडेकरांच्या हातात आल्यापासून या खात्याची इमेज बदलल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मीडियाने आपली लक्ष्मणरेषा स्वत:च आखून घ्यावी, तसे झाले नाही तर त्यात सरकारचा हस्तक्षेप होण्याची भीती आहे. तो संभाव्य हस्तक्षेप टाळण्यासाठी आधीच दक्षता घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादनही या वेळेस विजय दर्डा यांनी केले. त्यांच्या या भूमिकेचा उल्लेख केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, दीपक चौरसिया, ऋषी कपूर आणि दीपिका पदुकोण यांनीही आपल्या भाषणात केला.ऋषी कपूर आपल्या भाषणात म्हणाले, दर्डा यांनी मीडियाबद्दल जी भूमिका मांडली ती वास्तव आहे, मी स्वत: मीडियाचा बळी आहे. माझ्यावरही मीडियाने अन्याय केला आहे.दीपिका पदुकोण म्हणाल्या, आमच्याबद्दलचे गॉसिप छापले जाते मात्र मी ज्या ह्यद लिव्ह, लव्ह, लॉफ फाऊन्डेशनह्णच्या माध्यमातून सामाजिक कार्य करते त्याच्या बातम्या कोणी छापत नाही.