शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणा कोलमडली

By admin | Updated: July 15, 2017 01:38 IST

विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करण्यात आल्यामुळे तब्बल ५ हजार विद्यार्थी प्रक्रियेतून बाहेर पडले असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अकरावी प्रवेश प्रक्रिया पहिली फेरीनंतरच कोलमडली असल्याचे चित्र आहे. यंदा पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय स्वीकारण्याची विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करण्यात आल्यामुळे तब्बल ५ हजार विद्यार्थी प्रक्रियेतून बाहेर पडले असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे तसेच ४३ हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. केंद्रीय प्रवेश समितीच्या एककल्ली कारभारामुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविली जात आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी ७८ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी केवळ ३४ हजार ९८० विद्यार्थ्यांना पहिल्या फेरी अखेर प्रवेश मिळू शकला आहे. यंदा विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेले महाविद्यालय घेतलेच पहिजे अशी जबरदस्ती त्यांच्यावर करण्यात आली होती. पहिला पसंतीक्रम मिळालेल्या ४ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, त्यामुळे नव्या नियमानुसार ते आता प्रवेश प्रक्रियेतूनच बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी हे ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे गुणवत्ताधारक आहेत. त्यांच्या चांगल्या गुणांमुळेच त्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकले होते. मात्र समितीच्या जबरदस्तीमुळे त्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्षच अडचणीत आले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी केवळ २४ हजार ६७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. उर्वरित २३ हजार २५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्याचबरोबर पहिल्या फेरीत प्रवेशाच्या प्रतिक्षेत राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ८०६ इतकी आहे. त्यामुळे एकूण ४३ हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. १० हजार ३०८ विद्यार्थ्यांनी विविध कोटयाअंतर्गत प्रवेश घेतले आहेत.समितीने प्रवेशासाठी केवळ साडे तीन दिवसांची मुदत दिल्याने विद्यार्थी व पालकांना प्रवेशासाठी मोठी धावाधाव करावी लागली. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळूनही घेता आल्या नसल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत. गुरूवार अखेरपर्यंत २४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नव्हता. त्याचवेळी समितीने प्रवेश प्रक्रियेला किमान दोन दिवसांची मुदतवाढ देणे अपेक्षित होते, मात्र केवळ गुरूवारी दुपारी १२ पर्यंत मुदतवाढ दिली. त्याप्रमाणे गुरूवारी दुपारी प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ बंद करण्यात आले. यामुळे प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परत फिरावे लागले.>आॅनलाइन : पुढील फेऱ्यांबाबत संभ्रमअकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभुमीवर दुसरी फेरी कधीपासून राबविली जाणार, प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या ५ हजार विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार, सर्व ४३ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार ना असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र शिक्षण विभागाचे उपसंचालक दिनकर टेमकर व सहायक शिक्षण संचालक मिनाक्षी राऊत यांनी रात्री उशीरपर्यंत कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.>किचकट प्रक्रियेने गोंधळले पालक अन् विद्यार्थीसहज व सोप्या पध्दतीने हजारो विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश पडावेत म्हणून केंद्रीय पध्दतीने आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र समितीकडून विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या किचकट प्रक्रियेमुळे पालक व विद्यार्थी पूर्णपणे गोंधळून गेले आहेत.