शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

एमसीएची शरणागती

By admin | Updated: May 16, 2014 05:24 IST

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) यांच्यात रंगलेल्या कलगीतुर्‍यात अखेर एमसीएने शरणागती पत्करली

स्वदेश घाणेकर, मुंबई -  गेल्या तीन दिवसांपासून मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) यांच्यात रंगलेल्या कलगीतुर्‍यात अखेर एमसीएने शरणागती पत्करली. आयपीएलची अंतिम लढत वानखेडेवर व्हावी, यासाठी बंडाच्या तयारीत असलेल्या एमसीएने आयपीएल संचालन समितीच्या अटींच्या ‘गुगली’समोर माघार घेत वानखेडेवर शाहरुख खानच्या प्रवेशासह इतर अटीही मान्य केल्या. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय आयपीएल संचालन समितीच्या बैठकीत घेण्यात येईल, असे आयपीएल अध्यक्ष रंजीब बिस्वाल यांनी स्पष्ट केले. अंतिम लढत हवी असेल, तर आमच्या अटींची पूर्तता करा, असे खरमरीत पत्र मंगळवारी आयपीएल समितीने एमसीएला पाठवले होते. संचालन समितीने ठेवलेल्या सर्व अटी गुरुवारी दीड तास झालेल्या बैठकीत एमसीएच्या सदस्यांनी मान्य केले असून, त्या आशयाचे पत्रही त्यांना पाठविणार असल्याचे एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले. सर्व अटी मान्य केल्यानंतर तुम्ही शाहरुखला वानखेडेवर प्रवेश द्याल का? या प्रश्नावर सावंत म्हणाले, या अटींमध्ये सर्व संघमालकांना अंतिम सामना पाहण्याची परवानगी द्यावी, ही एक अट होती आणि तीही मान्य केली आहे. शाहरुख हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे, आणि तोही येऊ शकतो. मुंबईत ३ मे रोजी वानखेडेवर काही प्रमुख व्यक्तींना सुरक्षेच्या कारणास्तव स्टेडियमबाहेर ताटकळत बसावे लागले होते आणि त्यात पार्किंगची सोय नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला होता. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत आयपीएल संचालन समितीने तत्काळ बैठक घेऊन अंतिम सामना बंगळुरूला हलवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने अचंबित झालेल्या एमसीए पदाधिकार्‍यांनी अंतिम सामना हलविणार असाल, तर इतरही सामने नकोत, असाच पवित्रा घेतला आणि एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे साकडे घातले. तरीही आयपीएल समितीने अटींचे पत्र पाठवून एमसीएची पुरती कोंडी केली होती.