शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एमसीएची शरणागती

By admin | Updated: May 16, 2014 05:24 IST

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) यांच्यात रंगलेल्या कलगीतुर्‍यात अखेर एमसीएने शरणागती पत्करली

स्वदेश घाणेकर, मुंबई -  गेल्या तीन दिवसांपासून मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) यांच्यात रंगलेल्या कलगीतुर्‍यात अखेर एमसीएने शरणागती पत्करली. आयपीएलची अंतिम लढत वानखेडेवर व्हावी, यासाठी बंडाच्या तयारीत असलेल्या एमसीएने आयपीएल संचालन समितीच्या अटींच्या ‘गुगली’समोर माघार घेत वानखेडेवर शाहरुख खानच्या प्रवेशासह इतर अटीही मान्य केल्या. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय आयपीएल संचालन समितीच्या बैठकीत घेण्यात येईल, असे आयपीएल अध्यक्ष रंजीब बिस्वाल यांनी स्पष्ट केले. अंतिम लढत हवी असेल, तर आमच्या अटींची पूर्तता करा, असे खरमरीत पत्र मंगळवारी आयपीएल समितीने एमसीएला पाठवले होते. संचालन समितीने ठेवलेल्या सर्व अटी गुरुवारी दीड तास झालेल्या बैठकीत एमसीएच्या सदस्यांनी मान्य केले असून, त्या आशयाचे पत्रही त्यांना पाठविणार असल्याचे एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले. सर्व अटी मान्य केल्यानंतर तुम्ही शाहरुखला वानखेडेवर प्रवेश द्याल का? या प्रश्नावर सावंत म्हणाले, या अटींमध्ये सर्व संघमालकांना अंतिम सामना पाहण्याची परवानगी द्यावी, ही एक अट होती आणि तीही मान्य केली आहे. शाहरुख हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे, आणि तोही येऊ शकतो. मुंबईत ३ मे रोजी वानखेडेवर काही प्रमुख व्यक्तींना सुरक्षेच्या कारणास्तव स्टेडियमबाहेर ताटकळत बसावे लागले होते आणि त्यात पार्किंगची सोय नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला होता. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत आयपीएल संचालन समितीने तत्काळ बैठक घेऊन अंतिम सामना बंगळुरूला हलवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने अचंबित झालेल्या एमसीए पदाधिकार्‍यांनी अंतिम सामना हलविणार असाल, तर इतरही सामने नकोत, असाच पवित्रा घेतला आणि एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे साकडे घातले. तरीही आयपीएल समितीने अटींचे पत्र पाठवून एमसीएची पुरती कोंडी केली होती.