शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

माऊलींची पालखी अलंकापुरीत परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 20:36 IST

तब्बल एका महिन्याचा पायी प्रवास करून पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन आज अलंकापुरीत दाखल झालेल्या माऊलींच्या पालखीचे आळंदीकरांनी जंगी स्वागत केले.

ऑनलाइन लोकमतआळंदी, दि. २९ : तब्बल एका महिन्याचा पायी प्रवास करून पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन आज अलंकापुरीत दाखल झालेल्या माऊलींच्या पालखीचे आळंदीकरांनी जंगी स्वागत केले.

पालखीसह लाखो वारकरी व भाविकांच्या सोबत टाळ-मृदंगाचा गजर करीत संतजनांचा मेळा आज अलंकापुरीत दाखल होणार असल्यामुळे पालखीमार्गावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. प्रदक्षिणामार्गावर, महाद्वार चौक, नगरपालिका चौकात रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या वतीने माऊलीच्या पालखीवर फुलांची उधळण केली जात होती.

येथील राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांच्या वतीने विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी अल्पोपाहाराचे मोफत वाटप करण्यात येत होते. नगर परिषदेच्या वतीने पालखीमार्गावर औषधफवारणी करून रस्ते स्वच्छ करण्यात आले होते. पालखी विश्रांतवाडी परिसरात आल्याचा निरोप आळंदी मार्गावरील भाविकांना मिळताच त्यांनी पालखीचे पायी जाऊन स्वागत केले.

पोलीस प्रशासनाच्या वतीने मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखी नगरपालिका चौक, प्रदक्षिणामार्ग, इंद्रायणी घाट यामार्गे महाद्वारातून मंदिरात विसावली. मंदिरात प्रवेश करताना पालखीसोबत पुढे २७ व मागे २० अशा मानाच्या ४७ दिंड्या होत्या. पालखीचे मंदिर परिसरात आगमन होताच तेथेही भाविकांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर पालखीची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली.