शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

राजकारणासाठी माथाडी हिताशी तडजोड नाही

By admin | Updated: October 19, 2016 03:10 IST

एपीएमसीबाहेर मालाची चढ-उतार करण्याची कामे माथाडी कामगारांनाच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नवी मुंबई : एपीएमसीबाहेर मालाची चढ-उतार करण्याची कामे माथाडी कामगारांनाच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लवकरच माथाडी बोर्डात कर्मचारी भरती केली जाणार असून यात कामगारांच्या मुलांना संधी दिली जाईल. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधली असून राजकारणासाठी माथाडी हिताशी तडजोड कधीच केली जाणार नाही, असे मत आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. शासनाने भाजीपाला व फळे नियंत्रणमुक्त केल्यामुळे माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम होवू लागला होता. यामुळे एपीएमसीच्या बाहेरील चढ - उताराची कामेही नोंदीत माथाडी कामगारांना देण्यात यावीत अशी मागणी आमदार नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांनी केली होती. या मागणीची दखल घेवून पणन विभागाने ६आॅक्टोबरला अध्यादेश काढला आहे. एपीएमसीतील कामे दिवसेंदिवस कमी होवू लागली आहेत. यामुळे मार्केटबाहेर जाणाऱ्या मालाची चढ- उतार करण्याची व वाराईची कामे कामगारांना देण्यात यावीत असा अध्यादेश काढला असून पणन संचालकांसह सर्व संबंधितांना तशा सूचना दिल्या आहेत. कामगारांना याविषयी माहिती देण्यासाठी कांदा बटाटा मार्केटमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या हिताला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कामगारांच्या हितासाठीच मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधली आहे. माथाडी कामगारांच्या हिताच्या आड कोणी आले तर आम्ही ते सहन करणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांशी जवळीक केल्यामुळे मी भाजपात जाणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. मी कुठेही असलो तरी माथाडी कामगार हाच केंद्रबिंदू असेल असे स्पष्ट केले आहे. कोणत्याही स्थितीमध्ये कामगारांच्या विश्वासाला तडा जावून दिला जाणार नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी माथाडी बोर्डातील वस्तुस्थितीचा आढावा घेतला आहे. लवकरच तेथे कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. कामगारांनी त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी यासाठीचा अर्ज बोर्डात करावा व त्याची एक प्रत संघटना कार्यालयात जमा करावी. उपलब्ध अर्जांमधून परीक्षा घेवून भरती केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील व व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)