शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणासाठी माथाडी हिताशी तडजोड नाही

By admin | Updated: October 19, 2016 03:10 IST

एपीएमसीबाहेर मालाची चढ-उतार करण्याची कामे माथाडी कामगारांनाच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नवी मुंबई : एपीएमसीबाहेर मालाची चढ-उतार करण्याची कामे माथाडी कामगारांनाच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लवकरच माथाडी बोर्डात कर्मचारी भरती केली जाणार असून यात कामगारांच्या मुलांना संधी दिली जाईल. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठीच मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधली असून राजकारणासाठी माथाडी हिताशी तडजोड कधीच केली जाणार नाही, असे मत आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. शासनाने भाजीपाला व फळे नियंत्रणमुक्त केल्यामुळे माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम होवू लागला होता. यामुळे एपीएमसीच्या बाहेरील चढ - उताराची कामेही नोंदीत माथाडी कामगारांना देण्यात यावीत अशी मागणी आमदार नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांनी केली होती. या मागणीची दखल घेवून पणन विभागाने ६आॅक्टोबरला अध्यादेश काढला आहे. एपीएमसीतील कामे दिवसेंदिवस कमी होवू लागली आहेत. यामुळे मार्केटबाहेर जाणाऱ्या मालाची चढ- उतार करण्याची व वाराईची कामे कामगारांना देण्यात यावीत असा अध्यादेश काढला असून पणन संचालकांसह सर्व संबंधितांना तशा सूचना दिल्या आहेत. कामगारांना याविषयी माहिती देण्यासाठी कांदा बटाटा मार्केटमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या हिताला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कामगारांच्या हितासाठीच मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधली आहे. माथाडी कामगारांच्या हिताच्या आड कोणी आले तर आम्ही ते सहन करणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांशी जवळीक केल्यामुळे मी भाजपात जाणार असल्याच्या अफवा पसरत आहेत. मी कुठेही असलो तरी माथाडी कामगार हाच केंद्रबिंदू असेल असे स्पष्ट केले आहे. कोणत्याही स्थितीमध्ये कामगारांच्या विश्वासाला तडा जावून दिला जाणार नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी माथाडी बोर्डातील वस्तुस्थितीचा आढावा घेतला आहे. लवकरच तेथे कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. कामगारांनी त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी यासाठीचा अर्ज बोर्डात करावा व त्याची एक प्रत संघटना कार्यालयात जमा करावी. उपलब्ध अर्जांमधून परीक्षा घेवून भरती केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील व व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)