शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

वसई, विरारमध्ये भाजीपाला प्रचंड महागला

By admin | Updated: June 6, 2017 02:44 IST

भाजीपाला व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत न झाल्याने वसई विरारमध्ये भाजीपाला महागला आहे

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : शेतकऱ्यांच्या संप माघारी बाबतच्या संभ्रमामुळे अजूनही येथील भाजीपाला व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत न झाल्याने वसई विरारमध्ये भाजीपाला महागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुध पुरवठा बंद झाल्याने लोकांचे हाल होऊ लागले आहेत. सोमवारच्या बंदमुळे मंगळवारी दूध येणार नसल्याचे वितरकांनी सांगितले. तर गहू, तांदुळ आणि कडधान्याची आवक निम्म्याहूनही कमी झाल्याने त्याची झळ वसईकरांना सोसावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाला मिळत नसल्याचा फायदा चिकन आणि मटण विक्रेत्यांना होऊ लागला आहे. दोन दिवसात चिकन आणि मटणचे दर काही प्रमाणात वाढलेले दिसून आले. १ जूनपासून शेतकरी संपावर गेल्याचा परिणाम वसईत आता जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजीपाल्याची आवक एकदम कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर तीनपट वाढले आहेत. वसईत दररोज साधारण चौदाशे टन भाजीपाल्याची आवक होते. दोन दिवसांपासून ही आवक निम्म्याहून कमी झाली आहे. तर सोमवारी शेतकऱ्यांनी बंद पाळल्याने वसईत भाजीपाल्याचे ट्रक आले नाहीत. त्यामुळे वसईतील अनेक बाजारपेठा आज बंद होत्या. भाजीपाला नसल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दरात प्रचंड वाढ केली . आवक प्रचंड प्रमाणात घटल्याने भाजीपाल्याचे दर तीनपटीने वाढले आहेत. त्याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसू लागला आहे. टोमॅटो, सिमला मिरची, फरसबी, हिरवा वाटाणा, मिरची, लिंबू, कोथिंबीर, मिरची, गाजर, काकडी याची मागणी हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात असते. नेमक्या याच भाज्यांचे दर तीनपट वाढल्याने आर्थिक फटका बसू लागला आहे, अशी माहिती हॉटेल व्यावसायिक संतोष शेट्टी यांनी दिली. भाजीपाल्यासह तांदूळ, गहू आणि कडधान्याच्या पुरवठ्यावर मोठ्या परिणाम होऊ लागला आहे. संपापूर्वी वसईत दररोज तांदूळ २ हजार ८०० टन आणि गहूची १ हजार २०० टन इतकी आवक होती. संपामुळे तांदूळ, गव्हासह कडधान्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. सोमवारी गहू २९० टन आणि तांदूळ ५५० टन इतकाच वसईच्या बाजारात आला होता., अशी माहिती वसई तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली. तांदूळ, गहू आणि कडधान्याचे दर अद्याप स्थिर असले तरी संप असाच सुुरु राहिला तर मात्र त्यांचेही दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वसई विरार परिसरात दररोज साधारण तीन लाख लिटर पिशवीच्या दुधाचा पुरवठा होतो. हे दुध नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादकांकडून पुरवले जाते. शेतकऱ्यांच्या संपामुळे दूध पुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुधाची आवक चाळीस टक्क्यांनी घटली आहे. तर सोमवारी बंद असल्याने मंगळवारी दूध मिळणार नसल्याचे दूध उत्पादकांनी सांगितल्याने वसई विरारकांना मंगळवारी पिशवीचे दूध मिळणार नाही, अशी माहिती वसईतील दूध वितरक प्रशांत चौबळ यांनी दिली. महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघासह गोवर्धन, गोकुळ, गोदावरी, प्रभात, क्रिष्णा, हॅरिटेज यांचे दूध वसई विरार परिसरात जास्त प्रमाणात वितरित होते. नेमक्या याच उत्पादकांच्या दूध वितरणावर परिणाम झाल्याने वसईत दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.जेवण आणि नाश्त्यासाठी लागणाऱ्या भाजीपाल्याचे घाऊक दर तीन पटीने वाढले आहेत. त्यात दूधाचा तुटवडा असल्याने पंचाईत झाली आहे. बाहेर भाजी खरेदी करण्यापेक्षा हॉटेलमधील जेवण स्वस्त असल्याने ग्राहक सध्या हॉटेलमध्ये जेवणे पसंत करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भाजीपाला महागला तरी दर वाढवलेले नाहीत.-संतोष शेट्टी, हॉटेल व्यावसायिकदोन दिवसांपासून अनियमित आणि कमी दूध पुरवठा होऊ लागल्याने दुधाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच सोमवारच्या बंदमुळे मंगळवारी दूध पुरवठा होणार नाही. संपाबाबतचा संभ्रम दूर होत नाही तोपर्यंत वसईतील दुध पुरवठा पुर्ववत होणार नाही. त्याचा त्रास वसईकरांना सहन करावा लागणार आहे.-प्रशांत चौबळ, दूध वितरकशेतकऱ्यांच्या संपामुळे तांदूळ आणि गहूची आवक निम्म्याहून कमी झाली आहे. ती सुधारेपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.-प्रकाश पाटील, उपाध्यक्ष, वसई तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतलासरी शंभर टक्के बंदतलासरी : शेतकऱ्याच्या संपाला पाठींबा देण्यासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला तलासरीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला, तलासरी, उधवा गावातील सर्व बाजार पेठ बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी सहकार्य केले. तलासरीत सोमवार हा आठवडा बाजारचा दिवस परंतु बंद मुळे बाजार भरला नाही त्याचा फटका आदिवासींना बसला. आठवड्याचा भाजीपाला व इतर खरेदी साठी आलेल्यांना हात हलवीत परत जावे लागले. >भाजीपाल्याचे सोमवारचे घाऊक दर (किलोमध्ये)भाज्या संपापूर्वी सोमवारचे दर टोमॅटो १२ रुपये ६० रुपयेसिमला मिरची ४० ते ४५ रुपये ९० ते १०० रुपये फरसबी ३० रुपये ८० रुपये हिरवा वटाणा ३० रुपये ८० रुपये काकडी १६ रुपये ४० रुपये गाजर ३५ रुपये ९० रुपये भेंडी ३० रुपये ७० रुपये वांगी २० रुपये ४५ रुपये कोथिंबीर २५ रुपये जुडी ८० रुपये जुडीलिंबू १८० रुपये १०० नग ३०० रुपये १०० नग>बोईसरला भाजीपाल्याची प्रतिदिन २० टन आवक घटलीबोईसर: या शहरातील भाजीपाल्याची आवक प्रतिदिन २० टन घटली असून सुरतेहून येणारा तुटपुंजा भाजीपाला आणि स्थानिक किरकोळ भाजीपाल्यावरच सध्या नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे मात्र तारापूर एम आय डी सी तील अमूल कंपनीत गुजरात राज्यातून येणाऱ्या दुधामुळे दुधाचा पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही.बोईसारला ४ ते ५ मोठे भाजीपाल्याचे घाऊक (होलसेल) व्यापारी असून या सर्वांकडे नाशिक जिल्ह्यातिल पंचवटी मार्केट, सुरत, वाशी मार्केट, आणि स्थानिक छोट्या छोट्या शेती बागायती इत्यादी ठिकाणाहून विविध प्रकारचा सुमारे २० टन भाजीपाला प्रतिदिन येत असतो. परंतु सर्वत्र शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाल्याची आवक घटली . भाजीपाल्याच्या तुटवडया मुळे बोईसर व परिसरातील लाखो नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकही त्रस्त झाले असून सुकलेला आणि शिळा भाजीपाला चढ्या भावाने विकला जातोय त्याचप्रमाणे लग्न सोहळ्यात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत असल्याने भाजीपाल्याची आवक कधी वाढते व पुरवठा सुरळीत होतो याकडे लक्ष लागले आहे.