शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लग्नसराईच्या हंगामाचा एसटीला अहेर

By admin | Updated: May 26, 2016 01:23 IST

उत्पन्नात मोठी भर पडावी यासाठी एसटी महामंडळाने मोसमातील लग्नाच्या शेवटच्या मुहूर्ताचा फायदा घेत जादा वाहतूक करण्याचा निर्णय घेतला होता. ३0 एप्रिल आणि

मुंबई : उत्पन्नात मोठी भर पडावी यासाठी एसटी महामंडळाने मोसमातील लग्नाच्या शेवटच्या मुहूर्ताचा फायदा घेत जादा वाहतूक करण्याचा निर्णय घेतला होता. ३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी असलेल्या मुहूर्ताच्या दिवशी एसटी महामंडळाने राज्यात जादा वाहतूक केल्याने एकूण ३९ कोटी ४0 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. एसटी महामंडळाने ३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवसांत असणाऱ्या लग्नसराईचा फायदा घेऊन १0 टक्के जादा वाहतूक केली. जवळपास १,७00 पेक्षा अधिक बस महामंडळाकडून सोडण्यात आल्या. ज्या मार्गांवर आरक्षण पूर्ण झाले आहे अशा मार्गांवर प्रवासी गर्दीचा अंदाज घेऊन एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे ३0 एप्रिल रोजी २0 कोटी रुपये तर १ मे रोजी सोडलेल्या जादा वाहतुकीतून १९ कोटी ४0 लाख रुपये उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे. एप्रिलपासून दर दिवशी महामंडळाला दुष्काळामुळे १७ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. मात्र लग्नसराईतल्या या दोन दिवसांत महामंडळाने चांगली कमाई केली. मागील वर्षातील एप्रिल महिन्याच्या ३0 तारखेला आणि १ मे या दोन दिवसांत महामंडळाला एकूण ३६ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यात ३ कोटी ४0 लाखांची अधिक भर पडली आहे. (प्रतिनिधी)मुंबई प्रादेशिक विभाग आघाडीवरसर्वात जास्त उत्पन्न मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे या मुंबई प्रादेशिक विभागातून मिळाली आहे. उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळाने अधिकाऱ्यांना अनेक सूचनाही केल्या होत्या. यात महत्त्वाची बाब म्हणजे जादा वाहतुकीच्या गाड्या सुस्थितीत व स्वच्छ राहतील, याची दक्षता घेतानाच आवश्यकतेनुसार जादा फेऱ्यांचे नियोजन आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्य बसस्थानकातून पहाटे आपापल्या गावी जाणाऱ्या (स्थानिक) जादा बसही उपलब्ध करण्यात आल्या होत्या. ३0 एप्रिल रोजी २0 कोटी रुपये तर १ मे रोजी सोडलेल्या जादा वाहतुकीतून १९ कोटी ४0 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. एप्रिलपासून महामंडळाला दुष्काळामुळे प्रवासी घटल्याने रोज १७ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. लग्नसराईच्या विशेष गाड्यांमुळे मात्र चांगले उत्पन्न मिळाले.