शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

वावड्यांचा बाजार, कुणीही उठावे अन् वावडी उठवावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 02:25 IST

सध्या महाराष्ट्रात लाट आहे ती ‘ठाकरे सरकार डगमगू लागले आहे काय?’ या वावडीची. कोरोनाबाबत जशी अधूनमधून भलतीच नवी माहिती पुढे येते तशी ठाकरे सरकारच्या अस्थिरतेची वावडी वारंवार उठते

जगात, देशात, कुठेही पहा. वावड्यांचा बाजार सध्या तेजीत आहे. कुणीही उठावे आणि वावडी उठवावी. प्रकाशाच्या वेगाला थक्क करील अशा गतीने ती सर्वत्र पसरत जाते. ती वावडी असली तरीही त्यावर चर्चा झडू लागतात, वाद सुरू होतात, व्हॉट्सअ‍ॅप-ट्विटर तज्ज्ञ तावातावाने मते मांडतात. नेते प्रतिक्रिया देतात आणि त्या प्रतिक्रियांवर नवीन वावड्यांची धूम उठते. वस्तुस्थिती काय आहे, खरोखर काय घडले आहे किंवा खरेच कुणी काय वक्तव्य केले आहे, याची शहानिशा करण्याची फिकीर कोणाला नाही. कोविडसारखी महामारी समोर ठाकल्यावर नेतेमंडळी व माध्यमवीर थोडा गंभीरपणे विचार करू लागतील, विज्ञान-शास्र, अर्थशास्र याच्या आधाराने बोलतील असे प्रथम वाटत होते. परंतु तसे काहीच झाले नाही. उलट वावड्यांमध्ये अधिकाधिक लोक रस घेऊ लागले. रिकामपणी चघळायला वावडी बरी पडते हेही यामागील कारण असू शकेल. सुशांतसिंह प्रकरणापासून याला सुरुवात झाली आणि त्यानंतर वावड्यांच्या लाटांवर लाटा उठू लागल्या.

सध्या महाराष्ट्रात लाट आहे ती ‘ठाकरे सरकार डगमगू लागले आहे काय?’ या वावडीची. कोरोनाबाबत जशी अधूनमधून भलतीच नवी माहिती पुढे येते तशी ठाकरे सरकारच्या अस्थिरतेची वावडी वारंवार उठते आणि आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. एखादे क्षुल्लक वक्तव्य त्यासाठी पुरते. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील भेटीनंतर अशीच वावडी उठली. ही भेट म्हणजे राजकीय भूकंप असे वर्णन चित्रवाहिन्यांवर केले गेले. भूकंपासारखे विशेषण कधी वापरायचे याचे भान सामान्य वकुबाच्या अँकरना नसले तरी भेटीत काय झाले याची माहिती घेण्यापूर्वीच ट्विटर तज्ज्ञांनी राजकीय आडाखे बांधायला सुरुवात करावी हे आश्चर्यकारक होते. ‘शिवसेना-भाजपचे मनोमीलन जणू झालेच’, अशा रितीने बातम्या येण्यास सुरुवात झाली. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘सरकार कसे स्थिर आहे’ याचे दाखले येऊ लागले. या दाखल्यांना वजन यावे म्हणून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी पाण्यात देव घालून मोदी कसे बसले आहेत याच्या कहाण्या प्रसारित होऊ लागल्या. भाजपचे नेतेही या कहाण्यांमध्ये रंग भरू लागले. देवदयेने जनतेची सेवा करण्यास निघालेले ठाकरे सरकार पाडायचे हा केंद्र सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे ही एक बाजू, तर ठाकरे सरकार आपोआप पडणार आहे, आम्ही कशाला पाडू ही दुसरी बाजू ! यात राजकीय वस्तुस्थिती काय आहे याचा पत्ता कोणालाच नाही. वस्तुस्थिती जाणून घेण्याची कोणाला इच्छाही नाही. एका वावडीचा प्रतिवाद करण्यास दुसरी वावडी अशी वावड्यांची रंजक सिरिअल सध्या महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात सुरू आहे.

कोविडसारखी महामारी अनेक बाजंूनी नागरिकांना हतबल करीत असताना वावड्यांचा असा बाजार मांडणे हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. कोविडच्या परिणामांचे वास्तव भीषण आहे. संसर्ग झाला नसेल तर तो कधीही होईल याची धास्ती आहे, संसर्ग होऊन गेला असेल तर तो पुन्हा होण्याची धास्ती आहे, नोकरी टिकेल का ही भीती आहे, नोकरी टिकली तरी मिळणाऱ्या पगारात कौटुंबिक गरजा तरी भागतील का, या विचाराने नागरिक अस्वस्थ आहेत. उद्याच्या आयुष्याची खात्री नाही आणि आयुष्य टिकले तरी ते सुदृढ व सुखकर असेल का याचीही शाश्वती नाही. अशाश्वतेचे दाट सावट सध्या सर्वसामान्य मतदारांवर पडलेले आहे. राज्य कोणाचे आहे व ते किती काळ टिकणार आहे याची काळजी करण्याच्या मन:स्थितीत सध्या नागरिक नाहीत. जे राज्य आहे ते अशाश्वतेचे सावट दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे का हा नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. कार्यक्षम राज्यकारभार करणे जमत नसल्यामुळे वावड्या उठवल्या जातात का, मग त्या दिल्लीतील असोत वा मुंबईतील, असा प्रश्न यामुळे नागरिकांना पडतो. वावड्यांच्या भूलभुलय्यात नागरिकांना गुंग करून अपयश झाकता येईल असे नेत्यांना व त्यांच्यामागे फरफटत जाणाºया मीडियाला वाटत असेल तर ते वास्तवापासून दूर आहेत. वावड्यांचा बाजार मांडून टीआरपी मिळत असला तरी नागरिकांचा विश्वास मिळत नाही, मग ते नेते असोत वा माध्यमे !

राज्य कोणाचे आहे व ते किती काळ टिकणार आहे; याची काळजी करण्याच्या मन:स्थितीत सध्या नागरिक नाहीत. जे कुणी राज्यकर्ते राज्य करीत आहेत, ते अशाश्वततेचे सावट दूर करण्यासाठी काय करतात, हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना