शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बाजारपेठ शेतकऱ्यांचीच असावी

By admin | Updated: July 15, 2016 03:30 IST

कृषी उत्पन्न बाजारपेठ शेतकऱ्यांची राहिली नसून त्याची सूत्रे व्यापाऱ्यांच्या हाती एकवटली आहेत.ही बाजारपेठ व्यापाऱ्यांची नव्हे तर शेतकऱ्यांचीच असावी

विठ्ठल कवडे,  पंढरपूरकृषी उत्पन्न बाजारपेठ शेतकऱ्यांची राहिली नसून त्याची सूत्रे व्यापाऱ्यांच्या हाती एकवटली आहेत.ही बाजारपेठ व्यापाऱ्यांची नव्हे तर शेतकऱ्यांचीच असावी, असा आपला संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गुरुवारी सायंकाळी पंढरीत आगमन झाले़ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित ‘पंढरी कृषी’ प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर तर व्यासपीठावर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आदी उपस्थित होते.बाजारपेठ आवश्यक आहे, ती आपल्याला जिवंत ठेवायची आहे, परंतु शेतकऱ्यांना मारून ती जिवंत ठेवायची नाही. शेतकऱ्यांची बाजारपेठ शेतकऱ्यांच्याच हातात असली पाहिजे, यासाठी हा निर्णय घेतला. आपण शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ मुक्त केली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, जोपर्यंत राज्यातील शेतकरी समृद्ध होणार नाही, तोपर्यंत राज्य समृद्ध होणार नाही. राज्यातील १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून ८२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. शेतकरी आजही आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम राबविले. त्यामध्ये राज्यात सोलापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.