शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

मराठवाड्यालाच ३ हजार कोटींची गरज

By admin | Updated: December 30, 2015 00:47 IST

मागील तीन वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून दरवर्षी पॅकेज जाहीर होतात. यंदाही केंद्राने ३१०० कोटींचे पॅकेज जाहीर केले.

औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून दरवर्षी पॅकेज जाहीर होतात. यंदाही केंद्राने ३१०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. केंद्राची आर्थिक मदत संपूर्ण राज्यासाठी आहे. एकट्या मराठवाड्याचीच गरज यंदा तीन हजार कोटींची आहे. केंद्राच्या पॅकेजमध्ये राज्य शासन आपला वाटा किती टाकणार यावर दुष्काळवाड्या मराठवाड्याचे ‘गणित’अवलंबून आहे.मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता दरवर्षी हळूहळू वाढू लागली आहे. कर्जबाजारी शेतकरी सावकारांच्या पाशात अडकून एकानंतर एक आत्महत्या करीत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा दीडशेपर्यंत पोहोचला. आत्महत्यांचे सत्र अजूनही थांबलेले नाही. शेतात पीक नाही, खिशात दमडी नाही, अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्न गरीब शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मराठवाड्यातील तब्बल ८ हजार ५०० हून अधिक गावांची पैसेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे. दरवर्षी रबी आणि खरीप हंगाम आल्यावर कर्ज काढून शेतकरी पेरणी करीत आहेत. निसर्गाने दगा दिल्यावर शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडेच मोडले जात आहे.मंगळवारी केंद्र शासनाने महाराष्ट्रातील दुष्काळासाठी फक्त ३१०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. एवढ्या तुटपुंज्या निधीत संपूर्ण महाराष्ट्रात कशी मदत द्यायची हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एकट्या मराठवाड्याला खरीप हंगामाच्या मदतीसाठी सुमारे ३ हजार कोटींची गरज आहे. केंद्राच्या पॅकेजमध्ये राज्य शासन आपला वाटा म्हणून किती कोटी टाकणार यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.केंद्र शासनाला अहवाल सुपूर्दजून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागले नाही. जनावरांनाही चारा उरलेला नाही. खरीप हातचे गेले. पावसाने दडी मारल्यामुळे ३९ लाख ५३ हजार ८९८ हेक्टरवर झालेली खरिपाची पेरणी वाया गेल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. या भयावह परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मागील महिन्यात केंद्र शासनाचे पथक मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. पथकाने काही प्रमुख गावांची पाहणी करून केंद्र शासनाला आपला अहवाल सुपूर्द केला.