शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

मराठवाडा आर्थिक मागासलेपणाच्या वाटेवर

By admin | Updated: November 3, 2015 02:47 IST

मराठवाड्यात तीन वर्षांपासून दुष्काळ पडत असल्यामुळे पूर्ण विभाग; विशेषत: ग्रामीण भाग आर्थिक मागासलेपणाच्या वाटेवर चालला आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, घटलेली

औरंगाबाद : मराठवाड्यात तीन वर्षांपासून दुष्काळ पडत असल्यामुळे पूर्ण विभाग; विशेषत: ग्रामीण भाग आर्थिक मागासलेपणाच्या वाटेवर चालला आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, घटलेली शेती उत्पादकता, कमी पाऊस, रोजगाराच्या अपुऱ्या संधी यामुळे बँकिंग सेक्टरवर मोठा परिणाम झाल्याचे सांगत केंद्रीय वित्त समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. उपरोक्त स्थितीतून बाहेर पडण्यासाठी ग्रामीण उद्योग, पाण्याचे नियोजन, शेतीची उत्पादकता वाढविण्यासह काही महत्त्वाच्या पर्यायांवर चर्चा झाली. समितीने बैठकीअंती काढलेले निष्कर्ष गोपनीय असून ते संसदेत सादर करण्यात येणार आहेत. केंद्रीय वित्त समितीचे अध्यक्ष वीरप्पा मोईली, खा. किरीट सोमय्या, खा. चंद्रकांत खैरे, खा. अनिल शिरोळे, खा. दिग्विजय सिंह यांच्यासह आरबीआय, एसबीआय, बीओएम, एसबीएच या बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. समितीतील ३१पैकी १५ सदस्यांनी बैठकीला हजेरी लावली. मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि आर्थिक मागासलेपण वाढत असल्यामुळे त्यावर मोईली आणि दिग्विजय सिंह यांच्या इच्छेनुसार चर्चा झाली. पंचतारांकित चर्चादिल्ली गेट परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वित्त नियोजनाची बैठक झाली. बैठकीवर जलतज्ज्ञ आणि शेती प्रश्नांशी तळमळ असणाऱ्यांनी आगपाखड व्यक्त केली. बैठक संपल्यानंतर काही सदस्यांनी वेरूळ आणि घृष्णेश्वर मंदिराकडे प्रस्थान केले. चर्चेचा खर्च काही लाखांमध्ये झाला. माध्यमांना दूर ठेवण्यात आले. (प्रतिनिधी)पहिल्यांदाच आर्थिक धांडोळामराठवाड्याच्या आर्थिक परिस्थितीचा पहिल्यांदाच वित्त समितीच्या बैठकीत धांडोळा घेण्यात आला. ९० टक्के बँकिंग हे मुंबई व पुण्यात आहे. १० टक्के बँकिंग उर्वरित महाराष्ट्रात होते. त्यातील २ टक्के बँकिंग मराठवाड्यात होत आहे. विमा, पीक कर्जांबाबत बैठकीत चिंता व्यक्त झाली. उद्योगांना चालना मिळत नसल्यामुळे आर्थिक विकास दर घटल्याचे मत नोंदवले.