शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मराठवाडा नव्हे टँकरवाडा....!

By admin | Updated: April 26, 2016 19:20 IST

गेल्या काही वर्षापासून ऋतुमानाचे चक्र उलटे फिरत असल्याने हे सगळे काही घडत आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पाहता त्याला टँकरवाडा!....म्हणनेच योग्य वाटेल

नामदेव कुंभारमुंबई, दि. २६ - राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जनता दुष्काळाने होरपळत आहे. लातूरमध्ये मोठय़ा प्रमाणात त्याच्या झळा बसत असल्याने सरकारने मालगाडीतून या जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्याचे काम युद्धातळीवर सुरु आहे. दुष्काळ कोणालाही आवडत नाही. पण गेल्या काही वर्षापासून ऋतुमानाचे चक्र उलटे फिरत असल्याने हे सगळे काही घडत आहे. लातूरसह मराठवाड्यातील लोक आज भीषण दुष्काळला सामोरं जात आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पाहता त्याला टँकरवाडा!....म्हणनेच योग्य वाटेल. मराठवाडा विभागातील सुमारे २४०० गावे आणि ८४५ वाड्यांना ३२०० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचे चित्र लोकमतचे छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्या छायाचित्रामार्फत आपणास दुष्काळाचे चित्र दिसेल.

या वर्षी दुष्काळाची तीव्रता कमालीची आहे. राज्यात १७, मराठवाड्यात फक्त तीन टक्के पाणी साठा शिल्लक आहे. मनाला चटका लावून जाणाऱ्या अनेक घटनांच्या मध्यभागी मराठवाडा (नव्हे टँकरवाडा!) उभा आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पारा ४० अंश सेल्शिअसच्या पुढे सरकत असल्यामुळे पाण्याचे साठे आटू लागले आहेत

गावात पाणी नसल्याने शेती तसेच सर्वच प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. कर्ज घेवून पिकवलेली शेती पाण्याअभावी वाळून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी ५ ते १० किमीची पायपीट करावी लागत आहे.

राज्यभरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून सर्वात जास्त नुकसान शेतीचे झाले आहे. मराठवाडा, विदर्भात दुष्काळ असून हाताला काहीही काम मिळत नसल्याने अनेकांनी शहरांची वाट धरली आहे.

मराठवाडा विभागातील सुमारे २४०० गावे आणि ८४५ वाड्यांना ३२०० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५०२ गावे व १७ वाड्यांसाठी ७१० टँकरद्वारे, जालन्यात ४०० गावे आणि ६३ वाड्यांसाठी ४५० टँकर, परभणीत १४९ गावे, ३७ वाड्यांसाठी २०० टँकर.

हिंगोलीत २७ गावांमध्ये ३० टँकर, नांदेडमध्ये १८८ गावे, १३८ वाड्यांसाठी ३१० टँकर, बीडमध्ये ६२१ गावे आणि ५३४ वाड्यांसाठी ८०० टँकर, लातूरमध्ये १९३ गावे, ४३ वाड्यांसाठी २६० टँकर, तर उस्मानाबादमध्ये २३८ गावे आणि १३ वाड्यांसाठी ३४० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.

सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडल्याने यंदा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात सध्या फक्त ३ टक्के पाणी आहे. पाणीकपात असल्यामुळे कुटुंबातील काही महिलांना नाल्यातून वाहणाऱया पाण्यात कपडे धुवावे लागत आहेत.

दुष्काळ कोणालाही आवडत नाही. तो कोरडा असो वा ओला. या दोन्ही दुष्काळात शेतकरी पुरता नाडला जातो. हातातोंडाशी आलेले पीक हातातून गेल्यानंतर त्याच्या नशिबी येते ती हताशा. ती व्यक्त करण्याचे मार्ग मिळाले नाहीत.

आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. राज्यात गेल्या काही वर्षापासून हवामानावर आधारित शेतीची पार वाट लागलेली आहे