शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

मराठवाडा नव्हे टँकरवाडा....!

By admin | Updated: April 26, 2016 19:20 IST

गेल्या काही वर्षापासून ऋतुमानाचे चक्र उलटे फिरत असल्याने हे सगळे काही घडत आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पाहता त्याला टँकरवाडा!....म्हणनेच योग्य वाटेल

नामदेव कुंभारमुंबई, दि. २६ - राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जनता दुष्काळाने होरपळत आहे. लातूरमध्ये मोठय़ा प्रमाणात त्याच्या झळा बसत असल्याने सरकारने मालगाडीतून या जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्याचे काम युद्धातळीवर सुरु आहे. दुष्काळ कोणालाही आवडत नाही. पण गेल्या काही वर्षापासून ऋतुमानाचे चक्र उलटे फिरत असल्याने हे सगळे काही घडत आहे. लातूरसह मराठवाड्यातील लोक आज भीषण दुष्काळला सामोरं जात आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पाहता त्याला टँकरवाडा!....म्हणनेच योग्य वाटेल. मराठवाडा विभागातील सुमारे २४०० गावे आणि ८४५ वाड्यांना ३२०० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचे चित्र लोकमतचे छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्या छायाचित्रामार्फत आपणास दुष्काळाचे चित्र दिसेल.

या वर्षी दुष्काळाची तीव्रता कमालीची आहे. राज्यात १७, मराठवाड्यात फक्त तीन टक्के पाणी साठा शिल्लक आहे. मनाला चटका लावून जाणाऱ्या अनेक घटनांच्या मध्यभागी मराठवाडा (नव्हे टँकरवाडा!) उभा आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पारा ४० अंश सेल्शिअसच्या पुढे सरकत असल्यामुळे पाण्याचे साठे आटू लागले आहेत

गावात पाणी नसल्याने शेती तसेच सर्वच प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. कर्ज घेवून पिकवलेली शेती पाण्याअभावी वाळून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी ५ ते १० किमीची पायपीट करावी लागत आहे.

राज्यभरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून सर्वात जास्त नुकसान शेतीचे झाले आहे. मराठवाडा, विदर्भात दुष्काळ असून हाताला काहीही काम मिळत नसल्याने अनेकांनी शहरांची वाट धरली आहे.

मराठवाडा विभागातील सुमारे २४०० गावे आणि ८४५ वाड्यांना ३२०० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५०२ गावे व १७ वाड्यांसाठी ७१० टँकरद्वारे, जालन्यात ४०० गावे आणि ६३ वाड्यांसाठी ४५० टँकर, परभणीत १४९ गावे, ३७ वाड्यांसाठी २०० टँकर.

हिंगोलीत २७ गावांमध्ये ३० टँकर, नांदेडमध्ये १८८ गावे, १३८ वाड्यांसाठी ३१० टँकर, बीडमध्ये ६२१ गावे आणि ५३४ वाड्यांसाठी ८०० टँकर, लातूरमध्ये १९३ गावे, ४३ वाड्यांसाठी २६० टँकर, तर उस्मानाबादमध्ये २३८ गावे आणि १३ वाड्यांसाठी ३४० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.

सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडल्याने यंदा पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात सध्या फक्त ३ टक्के पाणी आहे. पाणीकपात असल्यामुळे कुटुंबातील काही महिलांना नाल्यातून वाहणाऱया पाण्यात कपडे धुवावे लागत आहेत.

दुष्काळ कोणालाही आवडत नाही. तो कोरडा असो वा ओला. या दोन्ही दुष्काळात शेतकरी पुरता नाडला जातो. हातातोंडाशी आलेले पीक हातातून गेल्यानंतर त्याच्या नशिबी येते ती हताशा. ती व्यक्त करण्याचे मार्ग मिळाले नाहीत.

आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. राज्यात गेल्या काही वर्षापासून हवामानावर आधारित शेतीची पार वाट लागलेली आहे