शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

मराठवाड्याला तूर्तास पाणी नाही

By admin | Updated: December 18, 2015 02:17 IST

नाशिक-नगरच्या आणि मराठवाड्यातील जायकवाडी जलाशयांत नेमका किती पाणीसाठा आहे, याची माहिती सादर करण्यासाठी राज्य सरकारला १४ जानेवारीपर्यंत वाढीव

मुंबई : नाशिक-नगरच्या आणि मराठवाड्यातील जायकवाडी जलाशयांत नेमका किती पाणीसाठा आहे, याची माहिती सादर करण्यासाठी राज्य सरकारला १४ जानेवारीपर्यंत वाढीव मुदत देत मुंबई उच्च न्यायालयाने तोपर्यंत नाशिक-नगरच्या जलाशयांतून, जायकवाडीच्या जलाशयात पाणी सोडण्यास गुरुवारी तात्पुरती स्थगिती दिली.नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीएमसीपैकी आत्तापर्यंत १०.७४६ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. उर्वरित २.४४ टीएमसी पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नाशिक-नगर व मराठवाड्याच्या जलाशयांमध्ये किती पाणीसाठा उपलब्ध आहे, याची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. गुरुवारच्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने याबाबत, मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांना याची माहिती देणे शक्य झाले नाही. त्यावर खंडपीठाने जोपर्यंत यासंबंधीची माहिती सादर केली जात नाही, तोपर्यंत उर्वरित २.४४ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश देणार नाही, असे स्पष्ट केले.गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास प्राधिकरणाने (जीएमआयडीसी) १७ आॅक्टोबर रोजी नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हे पाणी पिण्यासाठी व पिकांसाठी सोडण्यात येणार असल्याचे, जीएमआयडीसीने जाहीर केले. जीएमआयडीसीच्या या निर्णयाला नाशिक-नगरकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. अंतरिम दिलासा देताना, उच्च न्यायालयाने नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडीमध्ये पिण्यासाठीच पाणी सोडण्याचा आदेश जीएमआयडीसीला दिला. त्यानुसार, जीएमआयडीसीने १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात टप्प्याटप्प्याने सोडण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)आता नेमका वाद काय? नशिक-नगरकरांच्या अर्जानुसार, उच्च न्यायालयाने केवळ पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा स्पष्ट आदेश दिलेला असतानाही, सरकार शेतीसाठीही पाणी सोडत आहे. १२.८४ टीएमसी पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्याचा निर्णय ७ आॅक्टोबर रोजी जीएमआयडीसीने घेतला होता. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने पिण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे, याचा अंदाज काढून तेवढेच पाणी जायकवाडीमध्ये सोडावे, अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे.अंतिम सुनावणी १४ जानेवारीला : ‘पाण्याचा वापर कोणी शेतीसाठी करीत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करा. सरकारने लक्ष द्यावे. मुख्य सचिवांनी प्रत्येक ठिकाणी जावे, अशी अपेक्षा आम्ही करीत नाही, पण ते काही अधिकारी नेमू शकतात,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकांवरील अंतिम सुनावणी १४ जानेवारीला ठेवली. जीएमआयडीसीने याआधीच १२.८४ टीएमसी पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला होता, तर उच्च न्यायालयाने पिण्यासाठी पाणी सोडण्याचा आदेश दिला असल्याने, नाशिक-नगरकरांनी उच्च न्यायालयात अर्ज केला.नाशिक-नगरच्या जलाशयांतून सोडलेले 10.476 टीएमसी पाणी पिण्याकरिता सोडूनही मराठवाड्यातील लोक या पाण्याचा वापर शेतीस करत आहेत, असे याचिकाकर्त्यांतर्फे वकील प्रसाद ढाके-फाळकर यांनी खंडपीठाला सांगितले.