शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला तूर्तास पाणी नाही

By admin | Updated: December 18, 2015 02:17 IST

नाशिक-नगरच्या आणि मराठवाड्यातील जायकवाडी जलाशयांत नेमका किती पाणीसाठा आहे, याची माहिती सादर करण्यासाठी राज्य सरकारला १४ जानेवारीपर्यंत वाढीव

मुंबई : नाशिक-नगरच्या आणि मराठवाड्यातील जायकवाडी जलाशयांत नेमका किती पाणीसाठा आहे, याची माहिती सादर करण्यासाठी राज्य सरकारला १४ जानेवारीपर्यंत वाढीव मुदत देत मुंबई उच्च न्यायालयाने तोपर्यंत नाशिक-नगरच्या जलाशयांतून, जायकवाडीच्या जलाशयात पाणी सोडण्यास गुरुवारी तात्पुरती स्थगिती दिली.नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीएमसीपैकी आत्तापर्यंत १०.७४६ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. उर्वरित २.४४ टीएमसी पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नाशिक-नगर व मराठवाड्याच्या जलाशयांमध्ये किती पाणीसाठा उपलब्ध आहे, याची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. गुरुवारच्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने याबाबत, मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांना याची माहिती देणे शक्य झाले नाही. त्यावर खंडपीठाने जोपर्यंत यासंबंधीची माहिती सादर केली जात नाही, तोपर्यंत उर्वरित २.४४ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश देणार नाही, असे स्पष्ट केले.गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास प्राधिकरणाने (जीएमआयडीसी) १७ आॅक्टोबर रोजी नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हे पाणी पिण्यासाठी व पिकांसाठी सोडण्यात येणार असल्याचे, जीएमआयडीसीने जाहीर केले. जीएमआयडीसीच्या या निर्णयाला नाशिक-नगरकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. अंतरिम दिलासा देताना, उच्च न्यायालयाने नाशिक-नगरच्या धरणांतून जायकवाडीमध्ये पिण्यासाठीच पाणी सोडण्याचा आदेश जीएमआयडीसीला दिला. त्यानुसार, जीएमआयडीसीने १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात टप्प्याटप्प्याने सोडण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)आता नेमका वाद काय? नशिक-नगरकरांच्या अर्जानुसार, उच्च न्यायालयाने केवळ पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा स्पष्ट आदेश दिलेला असतानाही, सरकार शेतीसाठीही पाणी सोडत आहे. १२.८४ टीएमसी पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्याचा निर्णय ७ आॅक्टोबर रोजी जीएमआयडीसीने घेतला होता. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने पिण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे, याचा अंदाज काढून तेवढेच पाणी जायकवाडीमध्ये सोडावे, अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे.अंतिम सुनावणी १४ जानेवारीला : ‘पाण्याचा वापर कोणी शेतीसाठी करीत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करा. सरकारने लक्ष द्यावे. मुख्य सचिवांनी प्रत्येक ठिकाणी जावे, अशी अपेक्षा आम्ही करीत नाही, पण ते काही अधिकारी नेमू शकतात,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकांवरील अंतिम सुनावणी १४ जानेवारीला ठेवली. जीएमआयडीसीने याआधीच १२.८४ टीएमसी पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला होता, तर उच्च न्यायालयाने पिण्यासाठी पाणी सोडण्याचा आदेश दिला असल्याने, नाशिक-नगरकरांनी उच्च न्यायालयात अर्ज केला.नाशिक-नगरच्या जलाशयांतून सोडलेले 10.476 टीएमसी पाणी पिण्याकरिता सोडूनही मराठवाड्यातील लोक या पाण्याचा वापर शेतीस करत आहेत, असे याचिकाकर्त्यांतर्फे वकील प्रसाद ढाके-फाळकर यांनी खंडपीठाला सांगितले.