शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शहांचे मॅरेथॉन बौद्धिक

By admin | Updated: March 7, 2015 02:09 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला अवघे काही दिवस उरले असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी ऐन धुळवडीच्या दिवशी संघ मुख्यालयाला भेट दिली.

संघटनात्मक बदलांवर चर्चा : ३७० कलमावर ठाम राहण्याचे निर्देशनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला अवघे काही दिवस उरले असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी ऐन धुळवडीच्या दिवशी संघ मुख्यालयाला भेट दिली. दिवसभरात शहा यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासमवेत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. सुमारे ९ तास शहा संघ मुख्यालयात होते. या वेळी संघ आणि भाजपातील संघटनात्मक बदलांवर सखोल चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहा यांनी दुसऱ्यांदा संघस्थानाला भेट दिली. शहा यांचे सकाळी ७ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर सकाळी १० वाजता ते महाल परिसरातील संघ मुख्यालयात पोहोचले. या वेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल हेदेखील होते. सकाळच्या सुमारासच बैठकांचे सत्र सुरू झाले. १३ मार्चपासून नागपुरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू होणार असल्याने संघाचे वरिष्ठ पदाधिकारी मुख्यालयातच आहेत. सुरुवातीला सरसंघचालक, सरकार्यवाह व सहसरकार्यवाह दत्ताजी होसबळे यांनी शहा यांच्याकडून पक्षातील विविध मुद्द्यांसंदर्भात सखोल चर्चा केली. याप्रसंगी संघ व भाजपामध्ये समन्वयाची भूमिका पार पाडणारे सहसरकार्यवाह कृष्णगोपालदेखील उपस्थित होते. यात सर्वांत जास्त भर होता तो जम्मू व काश्मीरमधील स्थितीवर. सत्तास्थापनेनंतर ३७० कलम रद्द करण्याच्या भूमिकेसंदर्भात पक्षाचे धोरण काय असायला हवे यावर संघ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. पक्षाने आपली भूमिका सोडता कामा नये. जर पक्ष भूमिकेपासून दूर झाला तर जनतेत चुकीची प्रतिमा निर्माण होईल व पुढील निवडणुकांमध्ये याचा फटका बसू शकतो हा स्पष्ट संदेश या वेळी शहा यांना देण्यात आला. सोबतच भूसंपादन विधेयकावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात सरसंघचालकांनी संघाच्या अपेक्षा व्यक्त केल्या. संघ परिवारातील अनेक संघटना या विधेयकातील तरतुदींच्या विरोधात आहेत. संघ-भाजपाचे मिशन बिहारदिल्ली निवडणुकांमधील पराभवावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. जनतेला सरकारकडून अपेक्षापूर्ती हवी आहे. जनतेला गृहीत धरले तर इतर राज्यांमध्येदेखील दिल्लीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, असे थेट बोल सरसंघचालकांनी या वेळी शहा यांना सुनावले. पक्षातील नेत्यांवर नियंत्रण आणण्याचीदेखील सूचना करण्यात आली. काही महिन्यांवर असलेल्या बिहार निवडणुकांसंदर्भातील रणनीतीच्या प्रारूपावरदेखील चर्चा झाली. लवकरच दिल्ली येथे यासंदर्भात व्यापक बैठक होणार असल्याची माहिती संघाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.